शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

पाऊस परतला! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:32 IST

प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हय़ात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. वादळ वारा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. अकोला शहरातही बर्‍यापैकी पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना हायसे वाटले; पण पिण्याच्या पाण्यासाठी धो-धो पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देपिकांना मिळाली संजीवनीपिण्याच्या पाण्यासाठी ‘धो-धो’ची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हय़ात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. वादळ वारा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. अकोला शहरातही बर्‍यापैकी पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना हायसे वाटले; पण पिण्याच्या पाण्यासाठी धो-धो पावसाची गरज आहे.दुपारपर्यंतच्या तापमानानंतर ३ वाजता अचानक ढग दाटून आले. ढग पावसात परावर्तित होऊन पावसाला सुरुवात झाली. वादळ, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने शहरातील लघू उद्योजक, नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. विजांच्या कडकडामुळे नागरिकांनी बाहेर पडणे टाळले, रस्त्यावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळ गाठले. त्यामुळे काही मिनिटांतच रस्ते निर्मनुष्य झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मात्र संजीवनी मिळाली आहे. उष्ण तापमान, ढगाळ वातावरण हलका पाऊस या विषम वातावरणामुळे पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले आहे. हा पाऊस पिकांवरील कीड गळून पडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु त्यासाठी आणखी दमदार पाऊस हवा आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप मात्र सुरू  होती.दरम्यान, मराठवाड्यातून १ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाला सुरुवात होत असते, त्यामुळे परतीच्या पावसाला आता १५ दिवस उरले आहेत. जाता जाता पावसाचे पुनरागमन होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आता फक्त धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसाची गरज आहे.