शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पाऊस घडीभर, वीज पुरवठा खंडित रात्रभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST

संतोषकुमार गवई पातूर: पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होणे, हे समीकरण पातूर तालुक्यात कायम रुजले आहे. तालुक्यातील महावितरणचा ...

संतोषकुमार गवई

पातूर: पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होणे, हे समीकरण पातूर तालुक्यात कायम रुजले आहे. तालुक्यातील महावितरणचा कारभार वाऱ्यावर असून, नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. याकडे महावितणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

पातूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची बाब नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तसेच वीज कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुसऱ्या दिवसाची दुपार उजाडते. ग्रामीण भागातील गावागावात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने खासगी अप्रशिक्षित वीजसंबंधी कामे करतात. तालुक्यात कृषी फिडर अद्यापही स्वतंत्र करण्यात आलेले नाही. त्यामुळे वीज ग्राहकांचा वीज पुरवठा रात्र रात्रभर खंडित असतो. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

--------------------------

ट्रान्सफार्मर व कर्मचाऱ्यांची संख्या कमीच

पातूर तालुक्यात ट्रान्सफार्मरची संख्या कमी असल्याने वीज वहनाचा अधिभार अधिक आहे. जुन्या झालेल्या तारा वारंवार तुटत असतात. तसेच महावितरणकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने दुरुस्तीसाठी वेळ जातो. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी पाऊस आल्यानंतर तेवढ्याच तत्काळ वीज पुरवठा खंडित होतो.

-----------------

पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होतो. दिवसा खंडित झालेला वीज पुर‌वठा रात्रभर सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.

दीपक इंगळे, ग्रामस्थ, भंडारज बु.

---------------------------------

गावातील वीज पुरवठा खंडित तर होतोच, त्याचबरोबर शेतीची वीज पुरवठा खंडित होत असल्याने सिंचनासाठी अडचण जात आहे. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

- शंकर जाधव, रेशीम शेतकरी, पांगरताटी.