शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबला; भाजीपाला महागला

By admin | Updated: June 28, 2014 22:38 IST

पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे.

बुलडाणा: दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पाऊस न झाल्यास हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. पिकांना देण्यासाठी पाणी नाही आणि पाऊस नाही. त्यामुळे नवीन लागवड झाली नाही. परिणामी आवक एकदम घटली. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते. दर इतके घसरले की भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. परंतु सध्या बाजारात भाजीपाला येत नाही. भाजीपाला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दहा शेतकर्‍यांकडून हा माल जमा करावा लागतो. पाणी कमी पडल्याने करपलेला भाजीपाला बाजारात येत असून, तो लवकर खराब होतो. त्यामुळे नासाडी गृहीत धरून किरकोळ विक्रेते भाजीपाला खरेदी करतात. आवक नाही. त्यात नासाडी वाढली असून, साठविणे अशक्य आहे. आवक घटल्यास भाजीपाल्याचे दर आपोआप वाढत असतात. त्यानुसारच हे दर वाढत असून, भाजीपाला कडाडला आहे. पाऊस न पडल्यास हे दर आणखी वाढतील,असे भाजीपाला व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. इतर शहरांतून भाजीपाला आवक केल्यास त्याचे दर अधिक असतात. त्यामुळे तेही परवडत नाही. शहरातील भाजी बाजारामध्ये शेतकरी सकाळी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. व्यापार्‍यांकडून लिलाव करण्यात करण्यात येतो. लिलावासाठी शहरातील किरकोळ व्यापारी सकाळी दाखल होतात. व्यापार्‍यांकडून घेतलेला भाजीपाला किरकोळ विक्रेते शहरातून फिरतात. तसेच काही चौकात बसूनही भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.त्यांच्यामार्फत शहरात भाजीपाला थेट ग्राहकांपयर्ंत पोहोचविला जातो.