शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

पाऊस लांबला; भाजीपाला महागला

By admin | Updated: June 28, 2014 22:38 IST

पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे.

बुलडाणा: दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पाऊस न झाल्यास हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. पिकांना देण्यासाठी पाणी नाही आणि पाऊस नाही. त्यामुळे नवीन लागवड झाली नाही. परिणामी आवक एकदम घटली. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते. दर इतके घसरले की भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. परंतु सध्या बाजारात भाजीपाला येत नाही. भाजीपाला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दहा शेतकर्‍यांकडून हा माल जमा करावा लागतो. पाणी कमी पडल्याने करपलेला भाजीपाला बाजारात येत असून, तो लवकर खराब होतो. त्यामुळे नासाडी गृहीत धरून किरकोळ विक्रेते भाजीपाला खरेदी करतात. आवक नाही. त्यात नासाडी वाढली असून, साठविणे अशक्य आहे. आवक घटल्यास भाजीपाल्याचे दर आपोआप वाढत असतात. त्यानुसारच हे दर वाढत असून, भाजीपाला कडाडला आहे. पाऊस न पडल्यास हे दर आणखी वाढतील,असे भाजीपाला व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. इतर शहरांतून भाजीपाला आवक केल्यास त्याचे दर अधिक असतात. त्यामुळे तेही परवडत नाही. शहरातील भाजी बाजारामध्ये शेतकरी सकाळी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. व्यापार्‍यांकडून लिलाव करण्यात करण्यात येतो. लिलावासाठी शहरातील किरकोळ व्यापारी सकाळी दाखल होतात. व्यापार्‍यांकडून घेतलेला भाजीपाला किरकोळ विक्रेते शहरातून फिरतात. तसेच काही चौकात बसूनही भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.त्यांच्यामार्फत शहरात भाजीपाला थेट ग्राहकांपयर्ंत पोहोचविला जातो.