शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दांडी; बाजारपेठेत मरगळ

By admin | Updated: July 14, 2015 02:23 IST

कृषी बाजारपेठेत ५0 टक्के नुकसान, व्यावसायिकांच्याही डोळ्यात अश्रू.

विवेक चांदूरकर /अकोला: पाऊस, पाऊस अन पाऊस.. सध्या शेतकरी, मजूर, छोट्या-छोट्या दुकानदारांपासून तर मोठय़ा व्यावसायिकांपर्यंंत सर्वांंना आता केवळ पावसाचीच वाट असून, डोळे आकाशाकडे लागले आहेत. एक महिन्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेती व्यवसाय तर ठप्प झालाच आहे. मात्र याचा परिणाम सर्वच बाजारपेठेवर पडला असून, सराफा, कापड यासह अन्य व्यवसायातही मंदीचे सावट पसरले आहे. केवळ शेतकरीच नाही तर व्यावसायिकही आता चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. कृषी बाजारपेठेत चक्क व्यावसायिकांचे ५0 टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णत: कोलमडून पडला आहे. जिल्ह्यातील ७0 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच शेतीवर अवलंबून आहे. पाऊस येत नसल्यामुळे ग्रामीण भागात मरगळ पसरली आहे. शेतकरी, मजूर व गावागावांमधील व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. शेतकर्‍यांची पुंजी शेतात लागली आहे. त्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी व होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांना पाऊस हवा आहे. त्यासोबतच व्यावसायिकही पावसाची वाट पाहत आहेत. गतवर्षी शेतकर्‍यांनी उडीद, मुगासह तूर व सोयाबीनच्या बियाण्यांची खरेदी केली होती. मात्र, पाऊस तब्बल दोन महिने उशिरा आल्यामुळे उडीद व मुगाची पेरणी शेतकरी करून शकले नाहीत. परिणाम शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले. या अनुभवातून शहाणे होत, शेतकर्‍यांनी यावर्षी पाऊस आल्यानंतरच बियाण्यांची खरेदी केली. जिल्ह्यात यावर्षी पाऊस केवळ ७ ते १७ जूनपर्यंंतच झाला. त्यानंतर पावसाने दांडी दिली. १0 जुलैपर्यंंत जिल्ह्यात ६५ टक्के पेरणी झाली असून, ४५ टक्के पेरणी व्हायची आहे. पाऊसच नसल्यामुळे शेतकरी बियाणे व खत खरेदीच करीत नाही आहे. यामुळे कृषी बाजारपेठेवर मरगळ पसरली असून, ज्या व्यावसायिकांनी बियाणे व खताची खरेदी केली, त्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.