शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

 पाऊस लाबंला; मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:44 IST

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देशेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.शेतकऱ्यांना तूर, हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. काही शेतकºयांनी खरेदीच्या मुहूर्तावर हरभरा विकला; पण तेही चुकारे अद्याप मिळाले नाहीत. यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. मागील दोन वर्षे शेतकºयांनी पावसाच्या अगोदर बियाणे खरेदी केले; पण पाऊस वेळेवर न आल्याने बियाणे परत करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांचे बियाणे परत घेण्यात आले नाहीत. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.जूनच्या दुसºया आठवड्यात मूग, उडिदाची पेरणी केली जाते. पाऊस लांबला असून, मागच्या वर्षी मुगाचे पीक हातचे गेल्याने यावर्षी मूग, उडिदाची पेरणी घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने मूग, उडिदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला होता; पण पुन्हा यावर्षी हे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमुळे कापसाकडे वळणारा शेतकरी सोयाबीन बियाण्यांची पेरणी करणार, असे सध्या चित्र आहे.

 बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असून, पेरणी मात्र नाममात्र झाली. घेतलेले बियाणे पुन्हा परत घेतले जात नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मोहन सोनोने, कृषी निविष्ठा विपणन अभ्यासक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती