शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

रेल्वेला ४३ लाखांचा फटका; प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीटही ...

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीटही ५० रुपये करण्यात आले होते. प्रवासीही प्रवास टाळत होते; मात्र यामुळे रेल्वेच्या तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला. रेल्वेने २०१९-२० मध्ये अकोला स्थानकावरून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या माध्यमातून ४५ लाख रुपयांची कमाई केली होती; परंतु गतवर्षी १ लाख ८५ हजार रुपयांचीच तिकिटे विकली. त्यामुळे रेल्वेला ४३ लाख १५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, याकरिता प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता कोरोना रुग्णसंख्या घटत असून, निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे हे तिकीट पुन्हा दहा रुपये झाले आहे; परंतु या काळात प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री घटली. त्यामुळे रेल्वेला ४३ लाख रुपयांचा फटका बसला आहे; मात्र आता तिकीट १० रुपये झाल्याने प्रवाशांच्या आप्तांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई

२०१९-२०

४५ लाख

२०२०-२१

१,८५,०००

या गाड्या कधी सुरू होणार?

अमरावती-सुरत एक्स्प्रेस

भुसावळ-वर्धा पॅसेंजर

भुसावळ-नागपूर पॅसेंजर

भुसावळ-नगखेड पॅसेंजर

प्रवासी वाढले!

कोरोनाकाळात कडक निर्बंध असल्याने सर्व काही बंद होते. या वेळी रेल्वे चालू असल्या तरी प्रवासी मात्र कमी होते. बहुतांश व्यक्ती रेल्वेने प्रवास टाळत होते; परंतु राज्यात झालेल्या अनलॉकनंतर आता रेल्वे प्रवाशांची संख्या सर्व ठिकाणी वाढली आहे. त्यानुसार अकोला रेल्वे स्थानकावरही गर्दी वाढत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा

कोरोना संसर्गाच्या नावाखाली अजूनही विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत; मात्र पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. विशेष गाड्यांमध्ये केवळ आरक्षण केलेल्यांनाच प्रवास करता येतो. त्यामुळे आरक्षण न मिळालेल्यांची गोची होत आहे. शिवाय आरक्षण तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागत आहे.