शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला ४३ लाखांचा फटका; प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीटही ...

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीटही ५० रुपये करण्यात आले होते. प्रवासीही प्रवास टाळत होते; मात्र यामुळे रेल्वेच्या तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला. रेल्वेने २०१९-२० मध्ये अकोला स्थानकावरून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या माध्यमातून ४५ लाख रुपयांची कमाई केली होती; परंतु गतवर्षी १ लाख ८५ हजार रुपयांचीच तिकिटे विकली. त्यामुळे रेल्वेला ४३ लाख १५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, याकरिता प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता कोरोना रुग्णसंख्या घटत असून, निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे हे तिकीट पुन्हा दहा रुपये झाले आहे; परंतु या काळात प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री घटली. त्यामुळे रेल्वेला ४३ लाख रुपयांचा फटका बसला आहे; मात्र आता तिकीट १० रुपये झाल्याने प्रवाशांच्या आप्तांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई

२०१९-२०

४५ लाख

२०२०-२१

१,८५,०००

या गाड्या कधी सुरू होणार?

अमरावती-सुरत एक्स्प्रेस

भुसावळ-वर्धा पॅसेंजर

भुसावळ-नागपूर पॅसेंजर

भुसावळ-नगखेड पॅसेंजर

प्रवासी वाढले!

कोरोनाकाळात कडक निर्बंध असल्याने सर्व काही बंद होते. या वेळी रेल्वे चालू असल्या तरी प्रवासी मात्र कमी होते. बहुतांश व्यक्ती रेल्वेने प्रवास टाळत होते; परंतु राज्यात झालेल्या अनलॉकनंतर आता रेल्वे प्रवाशांची संख्या सर्व ठिकाणी वाढली आहे. त्यानुसार अकोला रेल्वे स्थानकावरही गर्दी वाढत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा

कोरोना संसर्गाच्या नावाखाली अजूनही विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत; मात्र पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. विशेष गाड्यांमध्ये केवळ आरक्षण केलेल्यांनाच प्रवास करता येतो. त्यामुळे आरक्षण न मिळालेल्यांची गोची होत आहे. शिवाय आरक्षण तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागत आहे.