शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रेल्वेची सहल विद्यार्थ्यांना पडणार महागात!

By admin | Updated: October 29, 2014 01:44 IST

सवलत काढून घेण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव.

अकोला : रेल्वे मंत्रालयाने विद्यार्थ्यांना दिली जाणारी ५0 टक्के भाड्याची सलवत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, विद्यार्थ्यांना सहलीला जाताना पूर्ण भाडे भरावे लागणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झुकझूक गाडीची सहल महागात पडणार आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांना विविध सुविधा देण्यात येतात. यात विद्यार्थ्यांसाठीदेखील काही सुविधा आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहलीकरिता विविध ठिकाणी जातात. या विद्यार्थ्यांना सहलीसाठी किंवा अभ्यास दौर्‍यासाठी रेल्वेकडून सवलत देण्यात येते. त्यानुसार ईच्छित प्रवासासाठी एकूण भाड्याच्या ५0 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना रेल्वेचा प्रवास करता येतो. कमी भाड्यात सुखकर आणि सुरक्षित प्रवास म्हणून या योजनेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी सवलत योजना बंद करतानाच, बुकींगसाठी असणार्‍या स्वतंत्र खिडक्यादेखील बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टुरिझम (आयआरसीटीसी) तर्फे विद्यार्थ्यांना सवलत अर्ज दिले जात होते. ते अर्ज भरुन तिकीट काढण्यासाठी मोठय़ा रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र खिडक्या होत्या. आता सवलतीसोबतच या स्वतंत्र खिडक्यादेखील बंद केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठीची सवलत योजना बंद झाल्याचे कोणतेही आदेश अद्याप आमच्यापर्यंत आलेले नाहीत. विभागीय कार्यालयाकडे अर्ज देवून विद्यार्थी अभ्यास दौर्‍यासाठी सवलत योजनेचा लाभ मिळवू शकतात, असे अकोला रेल्वे स्थानकाचे आरक्षण पर्यवेक्षक शिवराम कमल यांनी स्पष्ट केले.