शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

आरटीपीसीआर चाचणीमुळे टाळला जाताेय रेल्वेचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

लाॅकडाऊनच्या शंकेचाही परिणाम अकाेला : कोरोना संसर्गाची तिसरी....................................... लाट आली असून, देशभरात लॉकडाऊन होण्याचे चिन्हे आहेत. दुसरीकडे परराज्यात ...

लाॅकडाऊनच्या शंकेचाही परिणाम

अकाेला : कोरोना संसर्गाची तिसरी....................................... लाट आली असून, देशभरात लॉकडाऊन होण्याचे चिन्हे आहेत. दुसरीकडे परराज्यात प्रवेश करायचा असेल तर ७२ तासाच्या आतील काेराेना चाचणीचा अहवाल साेबत बाळगावा लागताे त्यामुळे

रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी आरक्षण तिकीट रद्द करण्यास वेग आला आहे. अकाेला रेल्वेस्थानकावरून गत तीन दिवसांपासून दरदिवशी १२५ ते १५० आरक्षण रद्द करण्यात येत आहे. जवळपास दीड लाख रुपये प्रवाशांना परतावा करावे लागत आहेत.

देशात कोरानाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, देशातील प्रमुख शहरांना कोरोनाने वेढले आहे. त्यामुळे याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर होत आहे. प्रवाशांनी उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता, दोन महिन्यांपूर्वीच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण करून ठेवले आहे. मात्र, कोरानाचा संसर्ग आणि मृत्यूसंख्या लक्षात घेता, अनेकांनी रेल्वेगाड्यांचे आरक्षण रद्द करण्याचे सत्र चालविले आहे. त्याअनुषंगाने अकाेला रेल्वेस्थानकावरून आरक्षण रद्द करण्यास वेग आला आहे. येथून बिहार, हरिद्धार, उत्तरप्रदेश, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, हावडा या मार्गे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण तिकीट रद्द करण्यात येत आहे.

विशेष रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी ओसरली

कोरोना संसर्गामुळे विशेष रेल्वेगाड्यांमध्ये एप्रिल महिन्यात अचानक गर्दी ओसरली आहे. मुंबई, पुणे मार्गावरील गाड्यांमध्येही आता आरक्षण सहजतेने मिळत आहे. पुणे, मुंबई येथे कडक लॉकडाऊनचा हा परिणाम मानला जात आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाला आरक्षण तिकीट रद्द होत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे.