शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रब्बी पेरणीचा टक्का वाढला; पण करडई, सूर्यफूल हद्दपार! जिल्ह्यात १.२२ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली 

By रवी दामोदर | Updated: December 25, 2023 18:29 IST

आतापर्यंत जिल्ह्यात १.२२ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.

अकोला: जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून, सध्यस्थितीत पेरणी क्षेत्राने सरासरीचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.२२ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. परंतु पूर्वी तेलबिया वाण म्हणून मोठ्या प्रमाणात पेरणी होत असलेले करडई, सूर्यफूल जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात सूर्यफुलाची पेरणीच झाली नसून, करडईची पेरणी केवळ ६८ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबरनंतर झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीमध्ये ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीला गती मिळाली. काही भागात अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने त्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याला पसंती दिल्याचे चित्र आहे. सध्यस्थितीत रब्बीची पेरणी सुरू असून, पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

जिल्ह्यात बाजारपेठेचाही अभावजिल्ह्यात शेतकरी सूर्यफूल व करडई मोठ्या प्रमाणात घेत होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतही आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश येथील व्यापारी दाखल होत होते. परंतु हळूहळू पेरा कमी होत गेल्याने व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आता तर सूर्यफूल व करडईसाठी बाजारपेठच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

पीक - पेरणी क्षेत्र - टक्के

  • रब्बी मका - १०५ - ३१
  • रब्बी ज्वारी - ८४१ - ९२
  • गहू -२१४७५ - ११२
  • हरभरा - १,१५,५६५ - ९५
  • कांदा - ४,९१७ -
  • सूर्यफूल - ०००० - ००
  • करडई -६८- २६
टॅग्स :Akolaअकोला