शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

रब्बीचेही उत्पादन घटणार; हरभरा पिकांची वाढ खुंटली, गहू पिकालाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:28 IST

यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिके पेरणीला एक ते दीड महिन्याचा विलंब झाल्याने हरभरा,गहू पिकांची वाढ खुंटली असून, किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बीचेही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे

अकोला : यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिके पेरणीला एक ते दीड महिन्याचा विलंब झाल्याने हरभरा,गहू पिकांची वाढ खुंटली असून, किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बीचेही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील हरभरा पिकाला संरक्षित ओलीत करण्यात येत आहे. तथापि, उशिरा पेरणी झाल्याने उत्पादन किती होईल, हे सांगता येणार नाही.हरभरा पेरणी यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यात आली. गहू पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात आली; परंतु उशिरा केलेल्या पेरणीमुळे अनेक भागातील हरभरा पिकाची वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक वाढीसाठी शेतकरी या पिकावर विविध प्रकारची औषध (टॉनिक) फवारणी करीत आहेत. काही भागात हरभरा पीक पिवळे पडत असल्याने बुरशीनाशक फवारणी करण्यात येत आहे. घाटेअळीने तोंड वर काढले आहे. खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन घटल्याने रब्बीतील पिकांवर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे; परंतु निसर्ग साथ देत नसल्याचे चित्र आहे.पाऊस व ढगाळ वातावरण आणखी आहेच त्याचाही पिकाच्या वाढीवर परिणाम होत असून, हे वातावरण पिकांवरील किडींना पोषक ठरत असल्याने हरभºयावर घाटेअळी आली आहे. अनेक भागात हरभरा पीक वाढत नसल्याचे चित्र आहे. किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने शेतकºयांचा खर्च वाढला आहे. विदर्भात यावर्षी गहू, हरभर पिकाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे या शेतकºयांची चिंता वाढली आहे.

 उशिरा पेरणी आणि सतत ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकाची वाढ खुंटली आहे. हे वातावरण निवळून तापमान वाढले तर या पिकांची वाढहोण्यास मदत होईल.- डॉ. अर्चना थोरात,हरभरा पैदासकार,कडधान्य संशोधन विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती