शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील काही भागात हरभरा ...

अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील काही भागात हरभरा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

शेतकऱ्यांना या वर्षी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पहिल्यांदा पेरणीच्या वेळी दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळ‌े सोयाबीनचे पीक हातचे गेले. भरवशाचे पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैशांची उसनवारी करीत रब्बी हंगामाची तयारी करून पेरणी केली. सध्या शेतात पीक बहरलेले असताना गत दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पीक धोक्यात सापडले आहे. रब्बी हंगामात उत्पन्न मिळेल, अशी आशा असताना ढगाळ वातावरणामुळे आशा धूसर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

रब्बी हंगामात महत्त्वाचे असणारे हरभरा पीक सध्या जोमात बहरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात हरभऱ्यावर फवारणी करताना शेतकरी दिसत आहे. हरभरा पिकावर आलेल्या या रोगामुळे रब्बी पीकही हातचे जाईल काय, या विवंचनेत शेतकरी आहेत. सद्य:स्थितीत काही भागातच हरभऱ्यावर रोग आला असून, कृषी विभागाने हरभऱ्यावर आलेल्या या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे.