शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

वऱ्हाडात ६ लाख हेक्टर होणार रब्बीची पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:49 IST

नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी हरभरा पिकासह गव्हाचा पेरा वाढणार आहे.

अकोला: परतीचा दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारा असल्याने पश्चिम (वºहाड) विदर्भात ६ लाख हेक्टरवर पेरणी वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी हरभरा पिकासह गव्हाचा पेरा वाढणार आहे.यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतही वार्षिक सरासरी भरून काढणारा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. परतीच्या पावसानेही बºयापैकी हजेरी लावल्याने यावर्षी सरासरी गाठली आहे. वºहाडातील अरुणावाती हा मोठा प्रकल्प सोडला तर इतर जवळपास प्रकल्प ओव्हरफ्लो’ झाले असून, वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनीदेखील मूग, उडीद काढलेल्या क्षेत्रावर हरभरा व जेथे सिंचनाची सोय आहे, तेथील शेतकºयांनी गहू पिकाचे नियोजन करू न पेरणीची तयारी केली. काही ठिकाणी पेरणीस प्रारंभही झाला आहे. हरभरा पीक पेरणी मोठ्या प्रमाणावर होत असते. तथापि, गत काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे हे पीक शेतकºयांना घेता आले नव्हते. यावर्षी पोषक स्थिती निर्माण झाली असून, त्यादृष्टीने कृषी विभाग व शेतकºयांनी नियोजन केले आहे. यावर्षी रब्बी ज्वारीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. खारपाणपट्ट्यात ज्वारीची पेरणी करण्यात येणार आहे. यावर्षी गहू पिकाला पाणी मिळण्याची शक्यता असल्याने गव्हाचे क्षेत्रदेखील वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, वºहाडात बुलडाणा जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टर, अकोला २ लाख हेक्टर तर वाशिम जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही पेरणी वाढणार आहे; परंतु यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती या मोठ्या प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा आहे.यावर्षी पूरक पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना वेळेवर खते मिळावी, यासाठीचेही नियोजन खते नियंत्रण समिती करणार असून, खताचा पुरवठा कधी व किती उपलब्ध झाला, कोणत्या विक्रेत्याकडे किती विक्रीस दिला, याचाही यावर्षी ताळेबंद ठेवला जाणार आहे.- मोहन वाघ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.-------------------------------------------------------------------------------------------

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती