शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र विभागांचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: August 22, 2014 00:26 IST

हवामान बदलामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले

अकोला : पावसाचा लहरीपणा आणि शेतकर्‍यांना हवमानाबाबत मिळणारी अपुरी माहिती, या पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठाध्ये स्वतंत्र कृषी हवामान केंद्र असावे, यासाठीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता प्रथम केरळने 'हवामान बदल शिक्षण आणि संशोधन अकादमी'ची स्थापना केली आहे. त्यानंतर पंजाब कृषी विद्यापीठाने स्कूल ऑफ क्लायमेंट चेंज अँन्ड अँग्रो मेटेरॉलाजीची स्थापना करून, हवामान बदलाच्या अभ्यासात आघाडी घेतली आहे. या दोन्ही विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला होता; पण या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळली नसल्याने या केंद्राचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील शेतीसमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान आहे. या बदलामुळे पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसात जास्त पाऊस पडणे, १८ तासांतच वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस पडणे किंवा तापमानात अचानक चढ उतार होणे, या सर्वांचा परिणाम पिकांवर आणि परिणामी उत्पादनावर होतो. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांपुढे संशोधन आणि पीक नियोजनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यात भौगोलिकदृष्ट्या नऊ कृषी हवामान विभाग आहेत. राज्यात डोंगराळ, सपाट तसेच खोलगट प्रदेश असून, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागांची पीक रचना वेगवेगळी आहे. या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठे आहेत; परंतु या विद्यापीठांकडे कृषी हवामानावर अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र संशोधन यंत्रणाच नाही. भविष्यात हवामान बदलाची परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने, शेतीला या संकटातून बाहेर काढता यावे आणि कृषी हवामानाचा अंदाज घेऊन सूक्ष्म पातळीवर शेतकर्‍यांना सल्ला देता यावा, यासाठी कृषी हवामान केंद्राची गरज आहे. कृषी विद्यापीठाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला तेव्हा, या प्रस्तावात या केंद्रासाठी लागणारी सर्व संसाधने, मनुष्यबळाची माहिती दिलेली आहे; तथापि शासनाने या प्रस्तावाला अद्याप मंजुरातच दिलेली नाही.