शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र विभागांचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: August 22, 2014 00:26 IST

हवामान बदलामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले

अकोला : पावसाचा लहरीपणा आणि शेतकर्‍यांना हवमानाबाबत मिळणारी अपुरी माहिती, या पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठाध्ये स्वतंत्र कृषी हवामान केंद्र असावे, यासाठीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता प्रथम केरळने 'हवामान बदल शिक्षण आणि संशोधन अकादमी'ची स्थापना केली आहे. त्यानंतर पंजाब कृषी विद्यापीठाने स्कूल ऑफ क्लायमेंट चेंज अँन्ड अँग्रो मेटेरॉलाजीची स्थापना करून, हवामान बदलाच्या अभ्यासात आघाडी घेतली आहे. या दोन्ही विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला होता; पण या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळली नसल्याने या केंद्राचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील शेतीसमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान आहे. या बदलामुळे पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसात जास्त पाऊस पडणे, १८ तासांतच वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस पडणे किंवा तापमानात अचानक चढ उतार होणे, या सर्वांचा परिणाम पिकांवर आणि परिणामी उत्पादनावर होतो. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांपुढे संशोधन आणि पीक नियोजनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यात भौगोलिकदृष्ट्या नऊ कृषी हवामान विभाग आहेत. राज्यात डोंगराळ, सपाट तसेच खोलगट प्रदेश असून, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागांची पीक रचना वेगवेगळी आहे. या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठे आहेत; परंतु या विद्यापीठांकडे कृषी हवामानावर अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र संशोधन यंत्रणाच नाही. भविष्यात हवामान बदलाची परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने, शेतीला या संकटातून बाहेर काढता यावे आणि कृषी हवामानाचा अंदाज घेऊन सूक्ष्म पातळीवर शेतकर्‍यांना सल्ला देता यावा, यासाठी कृषी हवामान केंद्राची गरज आहे. कृषी विद्यापीठाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला तेव्हा, या प्रस्तावात या केंद्रासाठी लागणारी सर्व संसाधने, मनुष्यबळाची माहिती दिलेली आहे; तथापि शासनाने या प्रस्तावाला अद्याप मंजुरातच दिलेली नाही.