शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

आजपासून जनता कर्फ्यू; संभ्रम कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:15 IST

जनता कर्फ्यूच्या धास्तीने गुरुवारी अकोल्याच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती.

अकोला : विदर्भ चेंबर आॅफ कामर्स अकोल्याच्या पुढाकाराने व सर्व व्यापारी संघटनांच्या एकमताने २५ ते २९ पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या कर्फ्यूसंदर्भात राजकीय पक्ष, लहान व्यापारी यांची नकारात्मक भूमिका असल्याने जनता कर्फ्यूचे स्वरूप कसे राहील, याबाबत संभ्रम कायमच आहे. दरम्यान, या जनता कर्फ्यूच्या धास्तीने गुरुवारी अकोल्याच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती.

राजकीय पक्ष म्हणतात...मागील ६ महिन्यांपासून अधिक काळापासून सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रोजच्या उदरनिर्वाहाच्या संकटासोबतच जीवन आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे, अशा स्थितीत जनता कर्फ्यू पर्याय होऊ शकत नाही, कर्फ्यूऐवजी प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनांसाठी सामूहिक उपक्रम सर्वांच्या समन्वयातून राबविण्याची गरज आहे.रणधीर सावरकर,आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला. जनता कर्फ्यू हा जनतेच्या भल्यासाठी आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रशासन उपाययोजना करतच आहे, त्यासाठी नागरिकांनीही सकारात्मक होऊन सहभागी होणे कुटुंब व समाजाच्या हिताचे आहे.नितीन देशमुख, आमदार व जिल्हाप्रमुख शिवसेना. जनता कर्फ्यूची वाट पाहण्याची वेळ नको. कोरोनाचे संकट हे दीर्घकालीन असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तिने दक्षता घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाला दूर ठेवावे-संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसोबतच सुरक्षेचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. जनता कर्फ्यूमुळे कोरोनाची साखळी तुटत असेल तर नागरिकांनी समर्थन केले पाहिजे.ज्यांना शक्य आहे त्यांनी तो पाळावा.बबनराव चौधरी, महानगराध्यक्ष, काँग्रेस. जनता कर्फ्यूमुळे कोरोना संसर्ग साखळी खंडित होणार नाही; मात्र आता कुठे जनजिवन सुरळीत होत असताना त्याला मात्र बे्रक बसेल. सर्वसामान्यांच्या रोजगारावर गंडांतर येईल, दुकाने बंद राहिली तर तेथील मजुरांना मजुरी मिळणार नाही, त्यामुळे उपाययोजना कराव्या, बंद नको.-प्रमोद देंडवे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. 

नाभिक समाजाचा विरोधनाभिक समाजाची सर्व दुकाने लॉकडाऊनच्या काळात तब्बल ९८ दिवस बंद होती. त्या काळात समाजाने केलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावरही अटी शर्तीवर दुकाने सुरू आहेत. या दुकानांच्या भरवशावरच उदरनिर्वाह आहे, त्यामुळे नाभिक समाज जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नाही, असे निवेदन नाभिक समाज दुकानदार संघटनेच्यावतिने अध्यक्ष गजानन वाघमारे, पांडुरंग मानकर, अनिल वायकर, सुभाष निंबोकार, राजेश श्रीवास्तव, जावेद अहेमद आदींनी दिले. भाजीपाला विक्रेता असोसिएशनचा विरोधमहाराष्टÑ चिल्लर भाजीपाला विक्रेता असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जनता कर्फ्यूला विरोध करत असल्याचे स्पष्ट केले आहे. विदर्भ चेंबरने सर्व व्यापारी संघटनांना विश्वासात घेऊन एकमताने निर्णय घेतला नसल्याचाही आरोप असोसिएशनचे सचिव काशिनाथ ताजणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

 भाजीपाल्यावर महागाईचा तडका व्यापाºयांनी पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. शुक्नवारपासून बाजारपेठ खुली होताच भाजीबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक भाज्यांची कमी झालेली आवक अन् ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता भाजीपाल्याचे दर महागले होते. दरवाढीच्या या तडक्यामुळे ग्राहकांना मात्र भुर्दंड बसला. टमाटे, भेंडी, पालक, कोबी, पत्ताकोबी, मिरची यांसह फळांचीही चढ्या भावात विक्री झाली.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या