शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत घोळ!

By admin | Updated: July 15, 2017 01:35 IST

अकोला: चौकशी अहवालानुसार पातूर तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गत चार वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले; मात्र जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संगोपन व संरक्षणाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.सन २०१२ ते २०१६ या चार वर्षाच्या कालावधीत पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यानुषंगाने तालुक्यातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी गत एप्रिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. पातूर तालुका कृषी अधिकारी एस.बी. मकासरे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत विभागातील सहायक गटविकास अधिकारी अशोक पराते व रोहयो शाखेचे उपअभियंता पाणझाडे सदस्य होते. सन २०१२ ते २०१६ या चार वर्षांच्या कालावधीत पातूर तालुक्यात करण्यात आलेली वृक्ष लागवड आणि जिवंत असलेले वृक्ष व वृक्ष संगोपन आणि संरक्षणाच्या कामावर करण्यात आलेल्या खर्चासंबंधी पंचनामे करून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीला दिला होता. त्यानुसार चौकशी समितीने गत मे अखेरपर्यंत चौकशी पूर्ण करुन, ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला. चौकशी अहवालानुसार तालुक्यात ६० ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असून, करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. तसेच जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संरक्षण व संगोपनाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यात वृक्ष लागवडीवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला. त्यामुळे पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.जबाबदार ठरणारे असे आहेत अधिकारी-कर्मचारी! पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीतील घोळासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित ग्रामसेवक, ग्राम रोजगारसेवक, पॅनल तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी व सहायक लेखाधिकारी इत्यादी अधिकारी व कर्मचारी जबाबदार ठरू शकतात, असे मत चौकशी समितीच्या एका सदस्याने व्यक्त केले.आता कारवाईकडे लागले लक्ष!पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, तालुक्यातील वृक्ष लागवडीत झालेल्या घोळाला जबाबदार ठरणाऱ्यांविरोधात कोणती कारवाई येते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.