शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत घोळ!

By admin | Updated: July 15, 2017 01:35 IST

अकोला: चौकशी अहवालानुसार पातूर तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गत चार वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले; मात्र जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संगोपन व संरक्षणाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.सन २०१२ ते २०१६ या चार वर्षाच्या कालावधीत पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यानुषंगाने तालुक्यातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी गत एप्रिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. पातूर तालुका कृषी अधिकारी एस.बी. मकासरे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत विभागातील सहायक गटविकास अधिकारी अशोक पराते व रोहयो शाखेचे उपअभियंता पाणझाडे सदस्य होते. सन २०१२ ते २०१६ या चार वर्षांच्या कालावधीत पातूर तालुक्यात करण्यात आलेली वृक्ष लागवड आणि जिवंत असलेले वृक्ष व वृक्ष संगोपन आणि संरक्षणाच्या कामावर करण्यात आलेल्या खर्चासंबंधी पंचनामे करून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीला दिला होता. त्यानुसार चौकशी समितीने गत मे अखेरपर्यंत चौकशी पूर्ण करुन, ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला. चौकशी अहवालानुसार तालुक्यात ६० ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असून, करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. तसेच जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संरक्षण व संगोपनाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यात वृक्ष लागवडीवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला. त्यामुळे पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.जबाबदार ठरणारे असे आहेत अधिकारी-कर्मचारी! पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीतील घोळासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित ग्रामसेवक, ग्राम रोजगारसेवक, पॅनल तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी व सहायक लेखाधिकारी इत्यादी अधिकारी व कर्मचारी जबाबदार ठरू शकतात, असे मत चौकशी समितीच्या एका सदस्याने व्यक्त केले.आता कारवाईकडे लागले लक्ष!पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, तालुक्यातील वृक्ष लागवडीत झालेल्या घोळाला जबाबदार ठरणाऱ्यांविरोधात कोणती कारवाई येते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.