शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत घोळ!

By admin | Updated: July 15, 2017 01:35 IST

अकोला: चौकशी अहवालानुसार पातूर तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गत चार वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले; मात्र जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संगोपन व संरक्षणाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.सन २०१२ ते २०१६ या चार वर्षाच्या कालावधीत पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यानुषंगाने तालुक्यातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी गत एप्रिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. पातूर तालुका कृषी अधिकारी एस.बी. मकासरे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत विभागातील सहायक गटविकास अधिकारी अशोक पराते व रोहयो शाखेचे उपअभियंता पाणझाडे सदस्य होते. सन २०१२ ते २०१६ या चार वर्षांच्या कालावधीत पातूर तालुक्यात करण्यात आलेली वृक्ष लागवड आणि जिवंत असलेले वृक्ष व वृक्ष संगोपन आणि संरक्षणाच्या कामावर करण्यात आलेल्या खर्चासंबंधी पंचनामे करून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीला दिला होता. त्यानुसार चौकशी समितीने गत मे अखेरपर्यंत चौकशी पूर्ण करुन, ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला. चौकशी अहवालानुसार तालुक्यात ६० ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असून, करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. तसेच जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संरक्षण व संगोपनाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यात वृक्ष लागवडीवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला. त्यामुळे पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.जबाबदार ठरणारे असे आहेत अधिकारी-कर्मचारी! पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीतील घोळासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित ग्रामसेवक, ग्राम रोजगारसेवक, पॅनल तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी व सहायक लेखाधिकारी इत्यादी अधिकारी व कर्मचारी जबाबदार ठरू शकतात, असे मत चौकशी समितीच्या एका सदस्याने व्यक्त केले.आता कारवाईकडे लागले लक्ष!पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, तालुक्यातील वृक्ष लागवडीत झालेल्या घोळाला जबाबदार ठरणाऱ्यांविरोधात कोणती कारवाई येते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.