शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पशु-पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST

वणी रंभापूर : सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, दरम्यान जंगलातील पाणवठे आटले आहेत. शिवाय उलंगवाडी झाल्याने पशू, पक्ष्यांना चारा, ...

वणी रंभापूर : सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, दरम्यान जंगलातील पाणवठे आटले आहेत. शिवाय उलंगवाडी झाल्याने पशू, पक्ष्यांना चारा, पाणी नसल्याने भटकंती होत आहे. पशू व पक्ष्यांची तहान, भूक भागविण्यासाठी पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पशुपक्ष्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेने बोरगाव मंजू, अन्वी मिर्झापूर, वणी रंभापूर, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी पशू व पक्ष्यांना अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरण संवर्धन संस्थेचे सर्पमित्र कुमार सदाशिव, सर्पमित्र सूरज सदाशिव, सत्यसागर चौरपागर, राजेश रायबोले, प्रवीण वाघमारे, गजानन वानखडे, योगेश तायडे, सचिन वानखडे, प्रफुल सदाशिव, सर्पमित्र प्रशांत नागे, रवी शिरसाठ, निशांत डोंगरे आदी परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम स्वखर्चाने राबवणार, अशी माहिती पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र कुमार सदाशिव यांनी दिली. (फोटो)