शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या!

By admin | Updated: August 29, 2015 00:24 IST

अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ठराव मंजूर.

अकोला: अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात जमीन खरवडून गेली. तसेच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.गत ४ व ५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतजमीनही खरवडून गेली. त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी, पिकांचे नुकसान आणि खरवडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईची मदत शासनाकडून तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी सभागृहात केली. त्यानुषंगाने यासंबंधीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बाश्रीटाकळी तालुक्यात सिंचन विहिरींसाठी शेतकर्‍यांकडून आलेले अर्ज व मंजूर अर्जासंबंधी पांडे गुरुजी यांनी विचारणा केली असता, सिंचन विहिरींसाठी शेतकर्‍यांकडून प्राप्त ८१0 अर्ज गत चार महिन्यांपासून अद्याप मंजुरीअभावी प्रलंबित असल्याची माहिती सभेत देण्यात आली. यासंदर्भात बाश्रीटाकळी पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांकडून मागविण्यात आलेला अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही सभेत सांगण्यात आले. स्थायी समितीच्या सभेला सभेला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे सभेत ठरविण्यात आले. किमान तीन दिवसआधी सदस्यांना सभेची नोटीस मिळाली पाहिजे, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली. महाजल योजनेंतर्गत वाडेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले; मात्र जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचत नसल्याचा मुद्दा सदस्य डॉ.हिंमत घाटोळ यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्ष शरद गवई यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांना दिले. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आणि उपलब्ध रोपे, कर वसुली, जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली कामे व इतर विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, सभापती गोदावरी जाधव, सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ.हिंमत घाटोळ, पुंडलिक अरबट, रामदास लांडे, गजानन उंबरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनमादार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.