शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वस्त म्हणून करा जैवविविधतेचे रक्षण!

By admin | Updated: May 22, 2017 01:07 IST

आज जागतिक जैवविविधता दिन : निसर्गातील बदल ठरताहेत जैवविविधतेला मारक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनुष्याच्या अतिहव्यासामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा होत असलेला अतिरिक्त वापर, जागतिक तापमान वाढ, या व इतर कारणांमुळे निसर्गाचा समतोल ढळला आहे. त्यासोबतच पृथ्वीतलावरील जैवविविधतेलाही त्याचा मोठा फटका बसला आहे. झपाट्याने नष्ट होत असलेली जैवविविधता कायम राहावी, यासाठी मनुष्याने विश्वस्त म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.जैवविविधतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी २२ मे रोजी जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो. यावर्षी जैवविविधता दिनाचे ब्रिदवाक्य ‘जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन’ हे आहे. राष्ट्रीय पातळीवर भारतातील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात पक्ष्यांच्या सुमारे ४५,००० तर प्राण्यांच्या ८,१०० प्रजाती आढळून येतात. पर्यावरणातील बदल व इतर कारणांमुळे यापैकी अनेक प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. यामध्ये पृष्ठवंशी प्राण्यांच्या ३८४, माशांच्या २३, उभयचर २, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २१, पाठीचा कणा नसलेले ९८, पक्ष्यांच्या १३३, सस्तन ८३ अशा एकूण ७२४ प्रजाती नष्ट झाल्या आहेत. या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी देशात राष्ट्रीय अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि १४ राखीव जंगले तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अभयारण्यांमध्ये जैवविविधताअकोला वन विभागाचे राखीव वनक्षेत्र ७७८ चौ. कि.मी. असून, या भागात मोठ्या प्रमाणात जैवविविधता दिसून येते. जिल्ह्यात नरनाळा, काटेपूर्णा, सोहळ अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये वाघ, बिबट, तडस, कोल्हा, लांडगा, सायळ, काळवीट, हरीण, नीलगाई व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पहावयास मिळतात. शहरात वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातीअकोला शहरात अत्यंत दुर्मीळ अशी वनस्पतींची जैवविविधता आढळते. यामध्ये भागवतवाडीजवळ असलेले वायूपर्णाचे वृक्ष, रेल्वे वसाहती जवळचे मिसवाकचे वृक्ष, राऊंड रोडवर कळंदाचे वृक्ष यांचा समावेश आहे. सूर्या गार्डन येथे राज्य वृक्ष जारुळ आहे. डॉ. पंदेकृविचे जंगल जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे सीता अशोक, हत्तीफळ व गोरव चिंच असे अत्यंत दुर्मीळ वृक्ष आहेत. मनुष्याने पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे प्रयत्न केले, तर परिसंस्थेतील जैवविविधता कायम ठेवता येते. जैवविविधतेचे विश्वस्त म्हणून आपण त्यांचे रक्षण केले पाहिजे. - गोविंद पांडे, वन्य जीव व पर्यावरण अभ्यासक, अको