शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

१५ व्या वित्त आयाेगातून काेट्यवधींची कामे प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:24 IST

मनपात ऑनलाईन प्रणालीद्वारे विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी प्रशासनाने १५ व्या वित्त आयाेगातून ५० ...

मनपात ऑनलाईन प्रणालीद्वारे विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी प्रशासनाने १५ व्या वित्त आयाेगातून ५० लाख रुपयांची तरतूद केली. यावर सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी तीव्र आक्षेप घेतला. यापूर्वी सुध्दा मनपा फंडातून २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येउन त्यापैकी कंत्राटदाराला १३ लाखांचे देयक अदा केले. शहरात मूलभूत सुविधांची बाेंब असताना श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी ५० लाखांच्या तरतुदीची घाई का,असा सवाल राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. भाजपचे सिद्धार्थ शर्मा यांनी देखील भटके कुत्रे व डुकरांच्या संदर्भात प्रशासनावर भ्रष्टाचाराचे शिंताेडे उडवले. या विषयाला महापाैर अर्चना मसने यांनी घाईघाईत मंजुरी दिल्याने राजेश मिश्रा यांनी सत्तापक्षाने प्रशासनासमाेर गुडघे टेकवल्याचा आराेप केला.

भटक्या कुत्र्यांना आधी शहराबाहेर काढा !

शहरात नेमक्या किती भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे, याचा थांगपत्ता नाही. श्वानांची वाढलेली संख्या धाेकादायक ठरत असून त्यांना आधी शहराबाहेर काढा, त्यानंतरच प्रस्ताव मंजूर करा,असे मत नगरसेवक बाळ टाले यांनी मांडले.

काेट्यवधींची कामे मंजूर पण...

प्रशासनाने १५ व्या वित्त आयाेगातून हद्दवाढ क्षेत्रासाठी जलवाहिनी व नाल्यांची कामे प्रस्तावित केली हाेती. त्यामध्ये सत्तापक्षाने दुरूस्ती सुचवित सुमारे १४ काेटींची कामे मंजूर केली. यावेळी काॅंग्रेस व सेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या सूचनेला ठेंगा दाखविण्यात आला. १५ वित्त आयाेगानुसार मनपात २५ ते ३० लाख रुपये अनुदान जमा असताना काेट्यवधींची कामे मंजूर करण्यावर विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी सत्ताधाऱ्यांची फिरकी घेतली. निवडणुकीच्या ताेंडावर अकाेलेकरांची दिशाभूल केली जात असल्याची टीका त्यांनी केली.

राजेश्वर सेतूच्या दुरुस्तीवर सेनेचा आक्षेप भाजपचे आ. गाेवर्धन शर्मा यांच्या निधीतून माेर्णा नदीच्या पात्रात पूल (राजेश्वर सेतू) उभारण्यात आला. पुरामुळे पुलाची दुरवस्था झाल्याने सत्ता पक्षाने १५ व्या वित्त आयाेगातून दुरुस्ती सुचवले असता त्यावर राजेश मिश्रा यांनी आक्षेप घेतला असता त्यावर अजय शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले.