शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित १५९ खेडी पाणीपुरवठा योजना रखडली!

By admin | Updated: March 3, 2017 02:01 IST

तेल्हारा तालुका : बहुतांश गावात पाण्यासाठी वणवण

सत्यशील सावरकरतेल्हारा, दि.२ - तेल्हारासह अकोट उपविभागातील वाढती पाणीटंचाई पाहता यावर कायम उपाययोजना करण्यासाठी आ. प्रकाश भारसाकळे यांनी पुढाकार घेऊन पाणीटंचाई आढावा बैठक बोलावली होती. मतदारसंघातील १५९ खेडी पाणीपुरवठा योजना वान प्रकल्प हनुमान सागरमधून घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत पुढाकार घेतला होता; परंतु तब्बल दीड वर्ष उलटूनसुद्धा याबाबत कोणतीच प्रगती झाली नाही. त्यामुळे, या योजनेचे घोडे अडले कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे.सूर्याने आग ओकण्याअगोदरच तेल्हारा तालुक्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील १०४ गावांपैकी बहुतांश गावात पाणी पातळी खोल गेल्याने कूपनलिका आटल्या आहेत तर काही गावांमध्ये प्रशासनामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दहीगावसह परिसरातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने किडनीसारखी रुग्णसंख्या वाढली आहे. दरवर्षी तालुक्यात उन्हाळा लागला म्हणजे पाणी समस्या निर्माण होते. यावर कायम पर्याय म्हणून मतदारसंघातील बारमाही पाणी असणारे व दरवर्षी शंभर टक्के भरणाऱ्या हनुमान सागरातून पाणीपुरवठा करण्याचा पुढाकार आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपल्या पहिल्याच पाणीटंचाई आढावा बैठकीत दीड वर्षाअगोदर घेतला आहे.त्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वान धरणातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता आ. भारसाकळे यांनी १३ डिसेंबर २०१४ च्या पाणीटंचाई आढावा सभेमध्ये आलेल्या पाणीटंचाई समस्येवर चर्चा केली. तालुक्यातील गावांना अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेतून नियमित व पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे तसेच गावागावातील भूजल पातळी खोल गेल्यामुळे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बाधित झाल्याने पाणीटंचाई भासू लागली. परिणामी सदर गावांना राष्ट्रीय ग्रामीण योजना कार्यक्रमांतर्गत वान धरातून नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करून पाणीपुरवठा करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींना उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांनी ग्रामसभांचे ठराव व प्रस्ताव मागितले होते. त्यावर ग्रामपंचायतीने ठरावसुद्धा दिले. यामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातील १५९ गावांची यादी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता प्रस्तावित यादीसुद्धा करण्यात आली होती. या यादीत तेल्हारा तालुक्यातील ८४ गावे व उर्वरित अकोट तालुक्यातील गावांचा समावेश होता. प्रस्तावित यादीतील तेल्हारा तालुक्यातील फक्त चार गावांची पाणी करण्याचे पत्र पंचायत स्तरावर प्राप्त झाले होते. मात्र, त्यानंतर या योजनेत कुठलीच प्रगती किंवा ग्रामपंचायतींना कोणताच पत्रव्यवहार केला गेला नसल्याचे समजते. वान हनुमान सागरातून पाणीपुरवठा योजना ही मतदारसंघाकरिता जीवनदायी योजना असल्याने याबाबत गावागावांतील नागरिकांचे विशेष लक्ष आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुन्हा याबाबत आढावा बैठक बोलावून पाणीटंचाईचा प्रश्न शासन स्तरावरून कायमचा मिटवावा, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.