शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

प्रस्तावित १५९ खेडी पाणीपुरवठा योजना रखडली!

By admin | Updated: March 3, 2017 02:01 IST

तेल्हारा तालुका : बहुतांश गावात पाण्यासाठी वणवण

सत्यशील सावरकरतेल्हारा, दि.२ - तेल्हारासह अकोट उपविभागातील वाढती पाणीटंचाई पाहता यावर कायम उपाययोजना करण्यासाठी आ. प्रकाश भारसाकळे यांनी पुढाकार घेऊन पाणीटंचाई आढावा बैठक बोलावली होती. मतदारसंघातील १५९ खेडी पाणीपुरवठा योजना वान प्रकल्प हनुमान सागरमधून घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत पुढाकार घेतला होता; परंतु तब्बल दीड वर्ष उलटूनसुद्धा याबाबत कोणतीच प्रगती झाली नाही. त्यामुळे, या योजनेचे घोडे अडले कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे.सूर्याने आग ओकण्याअगोदरच तेल्हारा तालुक्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील १०४ गावांपैकी बहुतांश गावात पाणी पातळी खोल गेल्याने कूपनलिका आटल्या आहेत तर काही गावांमध्ये प्रशासनामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दहीगावसह परिसरातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने किडनीसारखी रुग्णसंख्या वाढली आहे. दरवर्षी तालुक्यात उन्हाळा लागला म्हणजे पाणी समस्या निर्माण होते. यावर कायम पर्याय म्हणून मतदारसंघातील बारमाही पाणी असणारे व दरवर्षी शंभर टक्के भरणाऱ्या हनुमान सागरातून पाणीपुरवठा करण्याचा पुढाकार आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपल्या पहिल्याच पाणीटंचाई आढावा बैठकीत दीड वर्षाअगोदर घेतला आहे.त्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वान धरणातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता आ. भारसाकळे यांनी १३ डिसेंबर २०१४ च्या पाणीटंचाई आढावा सभेमध्ये आलेल्या पाणीटंचाई समस्येवर चर्चा केली. तालुक्यातील गावांना अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेतून नियमित व पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे तसेच गावागावातील भूजल पातळी खोल गेल्यामुळे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बाधित झाल्याने पाणीटंचाई भासू लागली. परिणामी सदर गावांना राष्ट्रीय ग्रामीण योजना कार्यक्रमांतर्गत वान धरातून नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करून पाणीपुरवठा करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींना उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांनी ग्रामसभांचे ठराव व प्रस्ताव मागितले होते. त्यावर ग्रामपंचायतीने ठरावसुद्धा दिले. यामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातील १५९ गावांची यादी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता प्रस्तावित यादीसुद्धा करण्यात आली होती. या यादीत तेल्हारा तालुक्यातील ८४ गावे व उर्वरित अकोट तालुक्यातील गावांचा समावेश होता. प्रस्तावित यादीतील तेल्हारा तालुक्यातील फक्त चार गावांची पाणी करण्याचे पत्र पंचायत स्तरावर प्राप्त झाले होते. मात्र, त्यानंतर या योजनेत कुठलीच प्रगती किंवा ग्रामपंचायतींना कोणताच पत्रव्यवहार केला गेला नसल्याचे समजते. वान हनुमान सागरातून पाणीपुरवठा योजना ही मतदारसंघाकरिता जीवनदायी योजना असल्याने याबाबत गावागावांतील नागरिकांचे विशेष लक्ष आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुन्हा याबाबत आढावा बैठक बोलावून पाणीटंचाईचा प्रश्न शासन स्तरावरून कायमचा मिटवावा, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.