शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधतेसाठी दोन हजारांवर उमेदवारांचे प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:38 IST

अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रांसाठी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केले.

ठळक मुद्देउमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस!सहाव्या दिवशी हजारावर अर्ज दाखल!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रांसाठी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केले.पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करताना, अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोच पावती जोडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांची गर्दी होत आहे. गत १५ सप्टेंबरपासून जात पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांचे प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. शुक्रवार, २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समिती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३0 वाजेपर्यंत असून, या वेळेपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत.

उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस!जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन  उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस असल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हय़ातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची झुंबड होणार आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत आहे. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत (प्रिंट) तहसील कार्यालयातील संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करण्याची वेळ दुपारी ४.३0 वाजेपर्यंत आहे.

नियोजन करण्याचे निर्देश!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शुक्रवारपर्यंंत केवळ २0 टक्के उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित ८0 टक्के उमेदवारी अर्ज मुदतीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दाखल होणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारणे, पोलीस बंदोबस्त, वाहनांची पार्किंंग व्यवस्था इत्यादी दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अकोला व बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

सहाव्या दिवशी हजारावर अर्ज दाखल!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी जिल्हय़ातील सहा तालुक्यांत १ हजार ६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात सरपंच पदांसाठी- १९ व ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी- ८७, अकोट तालुक्यात सरपंच पदांसाठी- ५८ व सदस्य पदांसाठी- १९९, मूर्तिजापूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ७७ व सदस्य पदांसाठी- १७३, बाळापूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ४३ व सदस्य पदांसाठी- ७८, बाश्रीटाकळी तालुक्यात सरपंच पदांसाठी- ५६ व सदस्य पदांसाठी- १५७, पातूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ३१ व सदस्य पदांसाठी- ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अकोला तालुक्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांंची माहिती रात्री उशिरापर्यंंत प्राप्त होऊ शकली नाही.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले.-एस.आर. कदम,उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती.