शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

उत्पादनखर्च हजारात वाढतोय; मात्र हमीभाव ४० रुपयांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

अकोला : दरवर्षी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मजुरीही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ ...

अकोला : दरवर्षी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मजुरीही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ होत आहे. अशातच केंद्र शासनाने रब्बी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. त्यामध्ये गहू, हरभरा पिकांना अल्पवाढ करण्यात आली आहे. उत्पादनखर्चात हजारांनी वाढ होत असताना हमीदरात मात्र ४० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

सध्या पेट्रोल, डिझेल दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना शेतीची मशागत, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र, शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात अत्यल्प वाढ होत आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला ४० रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला २०१५ रुपये असा भाव मिळणार आहे, तर हरभऱ्याला ५२३० रुपये म्हणजे यात केवळ १३० रुपयांची वाढ केली आहे. केवळ ४०,१३० रुपयांनी आधारभूत किंमत वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

शेतीतज्ज्ञ म्हणतात...

सरकारने हमीदराचे आमिष दाखविणे बंद करणे गरजेचे आहे. किमान आधारभूत किमतीने शेतकऱ्यांना कधीही त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळू शकत नाही. कारण, कोणतीही दराची हमी ही कमीत कमी असते. ती उत्पादनखर्चसुद्धा भरून काढू शकत नाही. सरकारने किमान आधारभूत किमतीची पद्धत ही रद्द करावी.

- ललित बहाळे

दरवर्षी मजुरी, खते, बी-बियाणे यांच्या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. त्या तुलनेत ही वाढ तोडकी आहे. ज्या प्रमाणात महागाई वाढते, त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढतो. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाववाढ होणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रकाश मानकर

सरकारने नेहमीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून, आकड्यांचा खेळ केला आहे. सिलिंडरचे भाव वर्षभरात १५० रुपयांनी वाढले आणि हमीभाव ४० रुपयांनी वाढत आहे. शेतकऱ्यांना न्याय न देण्याची सरकारची भूमिका आहे.

- प्रशांत गावंडे

शेतकरी म्हणतात...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे; परंतु दरवर्षी मजुरी १० टक्के, बियाणे व खते यांचे तर ३०-३५ टक्के वाढतात. त्या तुलनेत हमीदरात अत्यल्प वाढ होत आहे.

- बाळासाहेब रामचवरे, शेतकरी, रुस्तमाबाद

सरकारने घोषित केल्याप्रमाणे भाव दिले नाही. हरभऱ्यात दोन-तीन वर्षांत ४०० रुपये दरवाढ झाली आहे. माल असल्यास दर मिळत नाही. लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे हमीदर अत्यल्प आहे.

- उमेश फुलारी, शेतकरी, पातूर

शासनाने पिकांच्या आधारभूत किमतीत कुठे ४०, तर कुठे १३० रुपये वाढविले आहे. सद्य:स्थितीत बियाण्यांचे दर वाढले आहे. यामध्ये कीटकनाशके व खतेही वाढले असून, त्यानुसार हमीदरात वाढ झाली नाही.

- गणेश काळे, शेतकरी, तामशी