शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनखर्च हजारात वाढतोय; मात्र हमीभाव ४० रुपयांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

अकोला : दरवर्षी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मजुरीही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ ...

अकोला : दरवर्षी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मजुरीही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ होत आहे. अशातच केंद्र शासनाने रब्बी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. त्यामध्ये गहू, हरभरा पिकांना अल्पवाढ करण्यात आली आहे. उत्पादनखर्चात हजारांनी वाढ होत असताना हमीदरात मात्र ४० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

सध्या पेट्रोल, डिझेल दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना शेतीची मशागत, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र, शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात अत्यल्प वाढ होत आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला ४० रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला २०१५ रुपये असा भाव मिळणार आहे, तर हरभऱ्याला ५२३० रुपये म्हणजे यात केवळ १३० रुपयांची वाढ केली आहे. केवळ ४०,१३० रुपयांनी आधारभूत किंमत वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

शेतीतज्ज्ञ म्हणतात...

सरकारने हमीदराचे आमिष दाखविणे बंद करणे गरजेचे आहे. किमान आधारभूत किमतीने शेतकऱ्यांना कधीही त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळू शकत नाही. कारण, कोणतीही दराची हमी ही कमीत कमी असते. ती उत्पादनखर्चसुद्धा भरून काढू शकत नाही. सरकारने किमान आधारभूत किमतीची पद्धत ही रद्द करावी.

- ललित बहाळे

दरवर्षी मजुरी, खते, बी-बियाणे यांच्या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. त्या तुलनेत ही वाढ तोडकी आहे. ज्या प्रमाणात महागाई वाढते, त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढतो. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाववाढ होणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रकाश मानकर

सरकारने नेहमीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून, आकड्यांचा खेळ केला आहे. सिलिंडरचे भाव वर्षभरात १५० रुपयांनी वाढले आणि हमीभाव ४० रुपयांनी वाढत आहे. शेतकऱ्यांना न्याय न देण्याची सरकारची भूमिका आहे.

- प्रशांत गावंडे

शेतकरी म्हणतात...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे; परंतु दरवर्षी मजुरी १० टक्के, बियाणे व खते यांचे तर ३०-३५ टक्के वाढतात. त्या तुलनेत हमीदरात अत्यल्प वाढ होत आहे.

- बाळासाहेब रामचवरे, शेतकरी, रुस्तमाबाद

सरकारने घोषित केल्याप्रमाणे भाव दिले नाही. हरभऱ्यात दोन-तीन वर्षांत ४०० रुपये दरवाढ झाली आहे. माल असल्यास दर मिळत नाही. लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे हमीदर अत्यल्प आहे.

- उमेश फुलारी, शेतकरी, पातूर

शासनाने पिकांच्या आधारभूत किमतीत कुठे ४०, तर कुठे १३० रुपये वाढविले आहे. सद्य:स्थितीत बियाण्यांचे दर वाढले आहे. यामध्ये कीटकनाशके व खतेही वाढले असून, त्यानुसार हमीदरात वाढ झाली नाही.

- गणेश काळे, शेतकरी, तामशी