शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

  १५ जूनपर्यंत शेतमाल खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी -  कृषी मंत्र्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:33 IST

शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका व ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज यंत्रणेला दिले.

अकोला : शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका व ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज यंत्रणेला दिले. यावेळी ते म्हणाले, की खरेदी केंद्रावर येणारा माल हा शेतकऱ्यांचाच आहे की नाही, याची पडताळणी करण्यात यावी, शेतकºयाच्या नावाखाली व्यापारी माल विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे  स्पष्ट निर्देश ना. भुसे यांनी दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा आज अकोला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात आला. या बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तारेणिया उपस्थित होते.अमरावती विभागात लागवडयोग्य क्षेत्र ३५.१४ लाख हेक्टर इतके असून, खरीप हंगामाचे क्षेत्र हे ३२.३२ लाख हेक्टर इतके आहे. शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकºयांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घ्यावी, युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकºयांना युरिया कमी पडणार नाही; मात्र जमिनीचा पोत चांगला राहावा, यासाठी शेतकºयांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकºयांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

थकबाकीचा विचार न करता पीक कर्ज द्यावे!जे जे शेतकरी मागणी करतील, त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया बँका व बँकांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही ना. भुसे यांनी यावेळी दिला. त्या त्या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाºयांनी दर चार दिवसांनी आढावा घेऊन कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ना. भुसे यांनी दिले.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रministerमंत्री