शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

  १५ जूनपर्यंत शेतमाल खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी -  कृषी मंत्र्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:33 IST

शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका व ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज यंत्रणेला दिले.

अकोला : शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका व ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज यंत्रणेला दिले. यावेळी ते म्हणाले, की खरेदी केंद्रावर येणारा माल हा शेतकऱ्यांचाच आहे की नाही, याची पडताळणी करण्यात यावी, शेतकºयाच्या नावाखाली व्यापारी माल विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे  स्पष्ट निर्देश ना. भुसे यांनी दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा आज अकोला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात आला. या बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तारेणिया उपस्थित होते.अमरावती विभागात लागवडयोग्य क्षेत्र ३५.१४ लाख हेक्टर इतके असून, खरीप हंगामाचे क्षेत्र हे ३२.३२ लाख हेक्टर इतके आहे. शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकºयांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घ्यावी, युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकºयांना युरिया कमी पडणार नाही; मात्र जमिनीचा पोत चांगला राहावा, यासाठी शेतकºयांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकºयांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

थकबाकीचा विचार न करता पीक कर्ज द्यावे!जे जे शेतकरी मागणी करतील, त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया बँका व बँकांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही ना. भुसे यांनी यावेळी दिला. त्या त्या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाºयांनी दर चार दिवसांनी आढावा घेऊन कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ना. भुसे यांनी दिले.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रministerमंत्री