शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

महापालिकेच्या आकृतिबंधाची प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:14 IST

अकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदू नामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी आहेत किती, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु मागील पाच महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांच्या संख्येचा ताळमेळ जमेना!कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदू नामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी आहेत किती, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु मागील पाच महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे. महापालिकाच नव्हे, तर इतरही प्रशासकीय यंत्रणांमध्ये तेथील उपलब्ध कर्मचार्‍यांच्या संख्येनुसार कामकाज पार पडते. अर्थात, त्या-त्या विभागात कार्यरत कर्मचारी किती आणि ते कोणत्या संवर्गातील आहेत, ही बाब महत्त्वाची ठरते. बिंदू नामावली प्रक्रिया असो किंवा पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याकडे ‘मास्टरी’ असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळेच मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाक डे सादर केला आणि त्याला मंजुरी मिळाली. बिंदू नामावली अंतर्गत सरळसेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपाच्या जलप्रदाय विभाग, नगररचना, बांधकाम आदी विभागात तांत्रिक संवर्गातील कर्मचार्‍यांची अपुरी संख्या पाहता आयुक्त लहाने यांनी तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले. यादरम्यान, महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण कर्मचारी किती आणि विभागवार कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याची अचूक माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले. ही बाब पाहता महापालिकेचा आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. आकृतिबंधाची प्रक्रिया क्लिष्ट असली, तरी त्याची गरज ओळखून सामान्य प्रशासन विभागामार्फत ही प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती. अवघ्या दोन-तीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील जुजबी माहिती प्रशासनाकडे सादर केली. त्यानंतर कोठे माशी शिंक ली देव जाणे, ही प्रक्रियाच ठप्प पडल्याचे दिसून येत आहे. 

कर्मचार्‍यांचा मनमानी कारभारमहापालिकेचा आकृतिबंध तयार नसल्यामुळे कामचुकार कर्मचार्‍यांमध्ये आनंदीआनंद आहे. अनेक कर्मचारी बिळात दडून बसल्यासारखे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. मनपाच्या आस्थापनेवरील २ हजार २00 कर्मचारी पाहता बहुतांश कर्मचारी दिवसभर असतात तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो. अशा क ामचुकार कर्मचार्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू करण्याची नितांत गरज आहे. -