शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

तेल्हारावासीयांनी मुख्याधिकार्‍यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By admin | Updated: June 25, 2014 01:42 IST

तेल्हारा शहरातील नागरिक शहरातील विविध समस्यांमुळे त्रस्त.

तेल्हारा : स्थानिक नगरपालिका प्रशासनाचा कारभार पार ढेपाळला असून, शहरातील नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. शहरातील याच समस्यांमुळे त्रस्त झालेल्या माऊली चौक येथील युवकांनी न. प. मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचा पाढा वाचला. शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असून, प्रभागातील नाल्या तुडुंब भरल्या आहेत. या प्रभागात रस्ते चांगले नसल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. कचरा जमा करण्याची जबाबदारी असलेली घंटागाडी अनेक दिवसांपासून फिरकलीच नसल्याने या भागात कचर्‍याचे ढीग जागोजागी पडून आहेत तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्यांमुळे कंटाळलेल्या माऊली चौक येथील युवकांनी मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांची भेट घेऊन या समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली. समस्या त्वरित न सुटल्यास आंदोलनाचा इशारा युवकांनी मुख्याधिकार्‍यांना दिला.