शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी पिकावर यावर्षीही संक्रांत;  ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:25 IST

सतत पाऊस, रोगराई व ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कपाशी पिकाला गत काही वर्षांपासून ग्रहण लागले असून, यावर्षीही नेमके वाढ व फुले, पात्या येण्याच्या अवस्थेत सतत पाऊस, रोगराई व ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात १७ लाख हेक्टवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी ७० हजार हेक्टरने हे क्षेत्र वाढले आहे. तथापि, या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाला विलंब झाल्याने पेरणीला उशीर झाला.त्यानंतर आलेल्या अल्पशा पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु हा पाऊस सतत सुरू आहे. ढगाळ वातावरणही असल्याने पिकावर रोगराई वाढली. शेत तणाने व्यापल्याने पिकांचे नियंत्रण करता आले नाही. हे सर्व ४५ ते ६५ दिवस कपाशी पिकाची वाढ, फुले व पात्या झाडाला धरण्याच्या अवस्थेत झाल्याने कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला.सततच्या पावसामुळे शेतात बुरशी निर्माण झाली. झाडांच्या मुळांना अन्नद्रव्याचा पुरवठा बंद पडल्याने कपाशीची बोंडे सडली. काही ठिकाणी काळवंडली आहेत. भारी, काळ्या जमिनीवरील हे पीक पिवळे पडले.आता पिकांना वापशाची नितांत गरज आहे. ऊन पडले तरच तो मिळेल. अलीकडे तसे दिसत नसल्याने कपाशीचे सर्व पीक हातचे जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कपाशीचे पीक दिवाळीत घरी येते. तथापि, यावर्षी अद्याप हे पीक काही ठिकाणी फुलांवर, तर काही ठिकाणी बोंड्यांच्या अवस्थेत आहे. हा परिणाम देशी कपाशीपेक्षा बीटीवर अधिक दिसून येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कपाशीवरही परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी कपाशीला फुले धरली आहेत.यावर्षी पाऊस उशिरा आला. त्यानंतर झाडांची वाढ, फुले व पात्या धरण्याच्या ४५ ते ६५ दिवस सतत पाऊस सुरू असल्याने शेतात बुरशी, रोगराई व तण निर्माण झाले. झाडांच्या मुळांना अन्नद्रव्याचा पुरवठा होत नसल्याने पिके पिवळी पडली. क ाही भागात बोंंडे सडली. फुले, पात्या गळाल्या आहेत. परिणामी, यावर्षी ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.-डॉ. शरदराव निंबाळकर,शेती तज्ज्ञ तथा माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीcottonकापूस