शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

‘आत्मा’ची नोकरभरती करणार खाजगी संस्था!

By admin | Updated: May 6, 2015 00:58 IST

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय.

अकोला : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांची नोकरभरती आता खासगी संस्थाद्वारे करण्यात येणार असल्याचे संकेत असल्याने सध्या आत्मा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. हे नवे संकट असल्याचे वाटत असल्याने या कर्मचार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून या आदेशाच्या विरोधात आवाज उठविण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय कृषी धोरणामध्ये कृषी विस्तारातील क्रांतिकारी बदलांची गरज प्रामुख्याने समोर आल्याने कृषी विभागाच्या ह्यआत्माह्ण यंत्रणेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या माध्यमातून आत्मा यंत्रणेमार्फत शासनाच्या विविध योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात यश आले आहे. शेतकरी गट, नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा, शेतीपूरक व्यवसाय, कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, थेट शेतमाल विक्री याचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे. यासाठी या महाराष्ट्रात आजमितीस एक हजारांवर कंत्राटी कर्मचारी हे काम करीत आहेत. आजवर या कर्मचार्‍यांची नियुक्ती कृषी विभागानेच केली आहे, पण आता या नियुक्त्या बाह्य स्रोताद्वारे करण्याचा निर्णय शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक स्तरापर्यंतच्या कंत्राटी नियुक्त्या विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर एकत्रित मागणी घेऊन त्यानुसार यापुढे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याऐवजी बाहय़स्रोताद्वारे करण्यात याव्यात आणि बाहय़ स्रोताद्वारे नियुक्ती करताना अनुसूचित जाती, जमाती अधिनियमातील तरतुदीनुसार बिंदुनामावली तयार करू न त्यानुसार कार्यवाही करावी, असा आदेश ९ एप्रिल रोजी कृषी, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अवर सचिवांनी काढला. त्यामुळे आत्माच्या कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या यंत्रणेत काम करणार्‍या हजारो कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.