शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मा’ची नोकरभरती करणार खाजगी संस्था!

By admin | Updated: May 6, 2015 00:58 IST

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय.

अकोला : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांची नोकरभरती आता खासगी संस्थाद्वारे करण्यात येणार असल्याचे संकेत असल्याने सध्या आत्मा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. हे नवे संकट असल्याचे वाटत असल्याने या कर्मचार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून या आदेशाच्या विरोधात आवाज उठविण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय कृषी धोरणामध्ये कृषी विस्तारातील क्रांतिकारी बदलांची गरज प्रामुख्याने समोर आल्याने कृषी विभागाच्या ह्यआत्माह्ण यंत्रणेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या माध्यमातून आत्मा यंत्रणेमार्फत शासनाच्या विविध योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात यश आले आहे. शेतकरी गट, नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा, शेतीपूरक व्यवसाय, कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, थेट शेतमाल विक्री याचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे. यासाठी या महाराष्ट्रात आजमितीस एक हजारांवर कंत्राटी कर्मचारी हे काम करीत आहेत. आजवर या कर्मचार्‍यांची नियुक्ती कृषी विभागानेच केली आहे, पण आता या नियुक्त्या बाह्य स्रोताद्वारे करण्याचा निर्णय शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक स्तरापर्यंतच्या कंत्राटी नियुक्त्या विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर एकत्रित मागणी घेऊन त्यानुसार यापुढे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याऐवजी बाहय़स्रोताद्वारे करण्यात याव्यात आणि बाहय़ स्रोताद्वारे नियुक्ती करताना अनुसूचित जाती, जमाती अधिनियमातील तरतुदीनुसार बिंदुनामावली तयार करू न त्यानुसार कार्यवाही करावी, असा आदेश ९ एप्रिल रोजी कृषी, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अवर सचिवांनी काढला. त्यामुळे आत्माच्या कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या यंत्रणेत काम करणार्‍या हजारो कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.