शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची पूर्वतयारी जोरात

By admin | Updated: April 27, 2017 14:00 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे.

डीएमईआर संचालकांनी घेतला आढावा : कार्यक्रमाचा आराखडा निश्‍चितअकोला : राज्य शासनाकडून सहा जिल्हय़ांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, अकोला जिल्हय़ाचाही समावेश आहे. यानुषंगाने १ मेपासून जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे. याबाबतचा आराखडा निश्‍चित करण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, यानुषंगाने जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतची जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रदिनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हय़ात हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या असून, ते स्वत: या अभियानाच्या पूर्वतयारीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. शिंगारे व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी अभियानाच्या पूर्वतयारीचा व सूक्ष्म आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. डीएमईआर संचालकांनी अभियानाशी संबंधित आवश्यक सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.असा आहे आराखडाया अभियानांतर्गत २ ते २७ मेपर्यंत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन आरोग्यविषयक विचारपूस करणार आहेत. आजारी किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून त्यांच्याकडून २५ मुद्यांची प्रश्नावली भरून घेण्यात येईल. ही प्रश्नावली ऑनलाइन असून, ती रुग्णाच्या आधार व रेशन कार्डशी लिंक राहणार आहे. अशाप्रकारे रुग्णांचा डाटा तयार झाल्यानंतर ही माहिती मुंबईला पाठविली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर आजाराच्या स्वरूपानुसार ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी उपचार करण्यात येतील.