शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची पूर्वतयारी जोरात

By admin | Updated: April 27, 2017 14:00 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे.

डीएमईआर संचालकांनी घेतला आढावा : कार्यक्रमाचा आराखडा निश्‍चितअकोला : राज्य शासनाकडून सहा जिल्हय़ांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, अकोला जिल्हय़ाचाही समावेश आहे. यानुषंगाने १ मेपासून जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे. याबाबतचा आराखडा निश्‍चित करण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, यानुषंगाने जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतची जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रदिनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हय़ात हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या असून, ते स्वत: या अभियानाच्या पूर्वतयारीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. शिंगारे व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी अभियानाच्या पूर्वतयारीचा व सूक्ष्म आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. डीएमईआर संचालकांनी अभियानाशी संबंधित आवश्यक सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.असा आहे आराखडाया अभियानांतर्गत २ ते २७ मेपर्यंत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन आरोग्यविषयक विचारपूस करणार आहेत. आजारी किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून त्यांच्याकडून २५ मुद्यांची प्रश्नावली भरून घेण्यात येईल. ही प्रश्नावली ऑनलाइन असून, ती रुग्णाच्या आधार व रेशन कार्डशी लिंक राहणार आहे. अशाप्रकारे रुग्णांचा डाटा तयार झाल्यानंतर ही माहिती मुंबईला पाठविली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर आजाराच्या स्वरूपानुसार ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी उपचार करण्यात येतील.