शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची पूर्वतयारी जोरात

By admin | Updated: April 27, 2017 14:00 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे.

डीएमईआर संचालकांनी घेतला आढावा : कार्यक्रमाचा आराखडा निश्‍चितअकोला : राज्य शासनाकडून सहा जिल्हय़ांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, अकोला जिल्हय़ाचाही समावेश आहे. यानुषंगाने १ मेपासून जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे. याबाबतचा आराखडा निश्‍चित करण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, यानुषंगाने जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पथदश्री आरोग्य पूर्वतपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वतपासणी मोहिमेच्या निष्कर्षानुसार आरोग्य यंत्रणेस प्रशिक्षण, आजाराबाबतची जनजागृती आणि शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमार्फत विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रदिनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हय़ात हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या असून, ते स्वत: या अभियानाच्या पूर्वतयारीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. शिंगारे व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी अभियानाच्या पूर्वतयारीचा व सूक्ष्म आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. डीएमईआर संचालकांनी अभियानाशी संबंधित आवश्यक सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.असा आहे आराखडाया अभियानांतर्गत २ ते २७ मेपर्यंत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन आरोग्यविषयक विचारपूस करणार आहेत. आजारी किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून त्यांच्याकडून २५ मुद्यांची प्रश्नावली भरून घेण्यात येईल. ही प्रश्नावली ऑनलाइन असून, ती रुग्णाच्या आधार व रेशन कार्डशी लिंक राहणार आहे. अशाप्रकारे रुग्णांचा डाटा तयार झाल्यानंतर ही माहिती मुंबईला पाठविली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर आजाराच्या स्वरूपानुसार ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी उपचार करण्यात येतील.