शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या गरजेनुसार विकास कामांना प्राधान्य

By admin | Updated: November 16, 2016 02:07 IST

मूलभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर; पालकमंत्र्यांनी दिली माहिती.

अकोला, दि. १५- महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी मंगळवारी नगर विकास विभागाने २५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यापैकी २५ कोटींचा निधी अकोला शहरासाठी प्राप्त झाल्याची माहिती राज्याचे नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. अकोलेकरांची गरज लक्षात घेऊन ठोस विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्यामुळेच आजपर्यंत कोट्यवधींचा निधी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यात आणखी २५ कोटींची भर पडली. मूलभूत सुविधेंतर्गत शहरासाठी २५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला.या निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील ठोस विकासकामांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रथमच झोननिहाय बैठका घेऊन नगरसेवकांसह अकोलेकरांना कोणती कामे अपेक्षित आहेत, याबद्दल सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. निधीतून होणारी कामे ही दज्रेदार व नियोजित वेळेतच पूर्ण होतील यासाठी कटाक्षाने लक्ष दिले जाईल. विकास कामाच्या नियोजनाची प्रक्रिया येत्या दोन दिवसात सुरू होईल. जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे २५ कोटींचा निधी प्राप्त होण्यास मदत झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखित निधीचे विनियोजन केले जाईल. नेकलेस रस्त्याचे भाग्य उजळले२५ कोटींच्या निधीतून शहरातील ठोस विकास कामांवर भर दिला जाईल. यामध्ये नेकलेस रस्त्याचे भाग्य उजळले असून रस्त्यालगतचे विजेचे खांब हटवून दुर्गा चौक ते सिव्हिल लाइन चौकापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण केले जाईल. या माध्यमातून दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, अग्रसेन चौक ते बस स्थानक, मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन, सिव्हिल लाइन ते दुर्गा चौक असा रस्त्यांचा चतुष्कोन साधला जाणार आहे.कॅनॉल रस्त्यासाठी महसूल मंत्र्यांसोबत चर्चाजुने शहरातील कॅनॉल रोड ते जुना बाळापूर नाका ते राष्ट्रीय महामार्गालगच्या नवीन किराणा मार्केटपर्यंत सुमारे ३ किलोमीटर अंतराच्या प्रमुख रस्त्याचा तिढा निकाली काढण्यासाठी महसूल मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले. महापालिकेला दिलासामूलभूत सुविधेंतर्गत प्राप्त निधीत महापालिकेला एकूण निधीच्या ५0 टक्के हिस्सा जमा करावा लागतो. त्यानंतरच विकासकामांसाठी शासनाची मंजुरी मिळते. राज्यातील ह्यडह्णवर्ग महापालिकांची आर्थिक स्थिती ध्यानात घेता ५0 टक्के निधीची अट शिथिल करून १00 टक्के निधी देण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे.