शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राला कुलूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:23 IST

अकोट तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा भरणा केला. गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. विमा ...

अकोट तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा भरणा केला. गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, तो नंबर लागत नाही. त्यामुळे शेतकरी अतिवृष्टीची माहिती देण्याकरिता गेले असता प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राला कुलूप लावलेले आढळले. याठिकाणी कोणी कर्मचारी हजर राहत नाही. उलट नंतर विमा प्रतिनिधी हे पत्र दिले नाही. संपर्क केला नाही असे कारणे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. खरीप हंगामात बागायती व फळ पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. अतिवृष्टी, नैसर्गिकरित्या आलेल्या संकटाची माहिती त्वरित कळविण्यात यावी. जेणेकरुन पंचनामा, पाहणी करण्यात येणार असल्याच्या सूचना दिल्या जातात,परंतु वेळप्रसंगी विमा प्रतिनिधीशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नाही. शिवाय कार्यालय कुलूप बंद आढळत असल्याने संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी छावा संघटना तालुका प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर पाटील मानकर व शेतकऱ्यांनी केली आहे.

फाेटो:

१६३ गावांतील शेतकऱ्यांना फटका

तालुक्यातील ७२ हजार २९० हेक्टर खरीप हंगामाचे क्षेत्रफळ आहे. अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील अकोलखेड,पणज,उमरा, आसेगाव बाजार,मुडगांव,कुटासा, चोहट्टा बाजार या मंडळातील १६३ गावातील शेतकऱ्यांना फटका बसला. तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये तूर,उडीद,मूग,सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. इतर पिकांचे तुलनेत कपाशी, सोयाबीन नुकसान जास्त आहे. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.