शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी काेविड लस का घेतली नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST

अकाेला : कोरनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. फ्रंटलाइन काेराेनायाेद्ध्यांसाठी पहिल्या टप्प्यात हे लसीकरण ...

अकाेला : कोरनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. फ्रंटलाइन काेराेनायाेद्ध्यांसाठी पहिल्या टप्प्यात हे लसीकरण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही काेराेनायाेद्धा असतानाही त्यांनी लस का घेतली नाही, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. लससंदर्भात अनेक शास्रज्ञांमध्ये मतभेद आहेत, अशा स्थितीत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी सर्वांत आधी लस घेऊन लोकांमध्ये वस्तुपाठ ठेवला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानच या दाेघांनी ते लस कधी घेणार हे जाहीर करावे, असे आव्हान दिले.

त्यांच्या अकोला येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले की, अशा लसीकरण करण्याबाबत अनेक टप्पे मी पाहिले आहेत यापूर्वी लसीकरण झाले त्यामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी आधी लस घेतली असून, लोकांना विश्वास दिला हाेता. आता मात्र केवळ ढाेल वाजविण्याचे प्रकार सुरू आहे. ज्याप्रमाणे जुन्या काळात राजा शिकारीला जात असे तेव्हा ढाेल वाजविले जात हाेते. राज्याला वाटले तर शिकार केली जात असे तसाचा प्रकार आता सुरू आहे. केवळ लसीकरणाचे ढाेल वाजविले जात आहेत. जागतिक आराेग्य संघटनेच्या प्रमुखांनी स्पष्ट केल्याप्रमाणे इतर देशांनी जसे लसीकरणाचे नियाेजन केले तसे आपल्या देशात करणे अपेक्षित हाेते, मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही, असा आराेप त्यांनी केला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री लस घेतली असती तर लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला असता. दुसरे म्हणजे या दोन्ही नेत्यांना कोराेना झालेला नाही त्यामुळे कोराेना झाला नाही तर लक्ष देण्याची गरज नाही, असाही समज पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रियतेच्या निकषामध्ये पंतप्रधान क्रमांक एक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे त्यांनी लस घेण्याचे नियाेजन करावे व त्याचे थेट प्रेक्षपण करावे असे आवाहनही त्यांनी केले.

बाॅक्स

काेरानायाेद्धा कर्मचाऱ्यांबाबत सरकार असंवेदनशील

काेराेना उद्रेकाच्या काळात ज्या रुग्णांना डाॅक्टर हातही लावायला तयार नव्हते अशा रुग्णांसाठी तात्परुत्या स्वरूपात नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी माेलाची साथ दिली. आता काेराेना संपलेला नाही, मात्र तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे धाेरण सरकारने स्वीकारले आहे हे असंवेदनशीलतेचे लक्षण असल्याचे मत ॲड आंबेडकर यांनी व्यक्त केले.

बाॅक्स

धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून अभय

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आराेपानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे ट‌्विट केले हाेते. तेव्हाच मुंडे यांना अभय दिले जाईल, असे स्पष्ट झाले हाेते त्यावर आता शिक्कामाेर्तब झाले आहे अशा शब्दांत ॲड आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला टाेला लगावला आहे. माझ्या पक्षात मुंडे असते तर राजीनामा घेतला असता असेही ते म्हणाले.