शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

भाजीपाल्याचे भाव घसरले; शेतकरी अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

अवैध वृक्षतोड वाढली; वन विभागाचे दुर्लक्ष बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे काम सुरू आहे. या कामात वृक्षांची अवैध ...

अवैध वृक्षतोड वाढली; वन विभागाचे दुर्लक्ष

बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे काम सुरू आहे. या कामात वृक्षांची अवैध कत्तल होत असल्याचे चित्र आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात लाकूड माफियांकडूनही वृक्षतोड वाढली आहे. तालुक्यातील खिरपुरी-बारलिंगा रस्त्यावर झाडांची कत्तल केल्याचे दिसून येत आहे. (फोटो)

----------------------------------

बाळापूर शहरातील हातपंप बंदच!

बाळापूर : शहरातील अनेक हातपंप बंदच असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर हातपंपाची दुरुस्ती करण्यात येते; मात्र अवघ्या काही दिवसांतच हातपंप बंद पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

--------------------------------

उमरवाडी परिसरात पाणीटंचाईची समस्या

पांढुर्णा : येथून जवळच असलेल्या उमरवाडी येथे पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

------------------------------

खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था

भांबेरी : खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

----------------------------

मन नदीच्या पुलावरील कठड्यांची दुरवस्था!

बाळापूर : बाळापूर-पारस रस्त्यावरील भिकुंडखेडनजीक असलेल्या मन नदीच्या पुलावरील कठड्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कठडे बसविण्याची मागणी होत आहे.

-------------------------------

शिर्ला गावात सांडपाणी रस्त्यावर

शिर्ला : गावात नाल्यांची साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहात आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी पसरली आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

-------------------------------

वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त

पातूर: शहरासह तालुक्यात शुक्रवार, १५ जानेवारी रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.

------------------------------------------

तेल्हारा शहरातील मुत्रीघरांची दुरवस्था!

तेल्हारा : शहरातील मुत्रीघरांची दुरवस्था झाल्याने काही नागरिक उघड्यावर घाण करत असल्याने अन्य नागरिकांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुत्रीघरांच्या दुरवस्थेमुळे महिलांची कुचंबणा होत आहे.

---------------------------------

पातूर-मोर्णा रस्त्यावर जीवघेणा खड्डा!

पातूर : पातूर-मोर्णा रस्त्यावरुन सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डा पडला असून, या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.