शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

भाजीपाल्याचे भाव घसरले; शेतकरी अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

अवैध वृक्षतोड वाढली; वन विभागाचे दुर्लक्ष बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे काम सुरू आहे. या कामात वृक्षांची अवैध ...

अवैध वृक्षतोड वाढली; वन विभागाचे दुर्लक्ष

बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे काम सुरू आहे. या कामात वृक्षांची अवैध कत्तल होत असल्याचे चित्र आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात लाकूड माफियांकडूनही वृक्षतोड वाढली आहे. तालुक्यातील खिरपुरी-बारलिंगा रस्त्यावर झाडांची कत्तल केल्याचे दिसून येत आहे. (फोटो)

----------------------------------

बाळापूर शहरातील हातपंप बंदच!

बाळापूर : शहरातील अनेक हातपंप बंदच असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर हातपंपाची दुरुस्ती करण्यात येते; मात्र अवघ्या काही दिवसांतच हातपंप बंद पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

--------------------------------

उमरवाडी परिसरात पाणीटंचाईची समस्या

पांढुर्णा : येथून जवळच असलेल्या उमरवाडी येथे पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

------------------------------

खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था

भांबेरी : खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

----------------------------

मन नदीच्या पुलावरील कठड्यांची दुरवस्था!

बाळापूर : बाळापूर-पारस रस्त्यावरील भिकुंडखेडनजीक असलेल्या मन नदीच्या पुलावरील कठड्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कठडे बसविण्याची मागणी होत आहे.

-------------------------------

शिर्ला गावात सांडपाणी रस्त्यावर

शिर्ला : गावात नाल्यांची साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहात आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी पसरली आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

-------------------------------

वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त

पातूर: शहरासह तालुक्यात शुक्रवार, १५ जानेवारी रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.

------------------------------------------

तेल्हारा शहरातील मुत्रीघरांची दुरवस्था!

तेल्हारा : शहरातील मुत्रीघरांची दुरवस्था झाल्याने काही नागरिक उघड्यावर घाण करत असल्याने अन्य नागरिकांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुत्रीघरांच्या दुरवस्थेमुळे महिलांची कुचंबणा होत आहे.

---------------------------------

पातूर-मोर्णा रस्त्यावर जीवघेणा खड्डा!

पातूर : पातूर-मोर्णा रस्त्यावरुन सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डा पडला असून, या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.