शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहीहांडा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST

लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला ...

लॉकडाऊन असल्यामुळे मजूर वर्ग रिकामा झाला आहे. जवळचे होते, नव्हते सर्व खर्च करून टाकले. मजूर वर्ग व सामान्य जनतेला बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मागील सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र शासनाने जनतेला प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू आणि तांदूळ दिले होते. गहू आणि तांदळावर जीवन जगता येते का? जीवन जगण्याकरिता इतरही जीवनाश्यक वस्तूंची गरज भासते. नोव्हेंबर २०२० पासून गोरगरीब जनता कामधंद्यांच्या शोधात असून, कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्ग, गोरगरीब जनतेसमोर संकट उभे थाटले आहे. मजूर वर्गाच्या हाताला कोणतेच प्रकारचे कामधंदे नसल्यामुळे मजूर वर्गावर व इतर छोट्या व्यापारी वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. दैनंदिन जीवनात खाद्यतेल लागतेच, सोयाबीन खाद्यतेलाचे भाव १४५ रुपये किलो, साखर ४० रुपये, गूळ ५० ते ६० रुपये किलो विकल्या जात आहे. काही महिन्यांपासून दहीहांडा येथील बाजार भरत नसल्यामुळे गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बाजार भरत नसल्यामुळे बाहेर गावाचे व्यापारी येत नाहीत. गावातील काही व्यापारी याचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लुबाडणूक करीत आहेत. दहीहांडा येथे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. भाजीपाला व्यापारी दामदुपटीने विक्री करीत आहेत. यासाठी बाहेरगावच्या व्यापारी वर्गाला गावात येऊन व्यापार करण्याची नियमानुसार परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच व्यापारी वर्गाकडून गोरगरीब जनतेची लूट थांबवावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.