शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

सोयाबीनला ९ तर कपाशीला १२,५०० हजार रुपये भाव द्या- रविकांत तुपकर

By रवी दामोदर | Updated: October 27, 2023 18:33 IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढणार ‘एल्गार रथयात्रा’

अकोला: यंदा पावसाचा प्रदीर्घ खंड व यलो मोझॅकमुळे खरीप हंगामात सोयाबीनच्या उताऱ्यात प्रचंड घट झाली आहे. त्यात बाजारात सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थिती सरकारने विना अट प्रति एक्कर १० हजार रुपयांची मदत करावी, तसेच सोयाबीन पिकाला ९ हजार, तर कपाशीला १२,५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहिर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दि.२७ ऑक्टोबर रोजी अकोल्यात आयोजित पत्रपरिषदेतून केली. तसेच कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा संयम सुटला असून, विविध मागण्यांसाठी दि.१ नोव्हेंबर रोजी शेगाव येथून ‘एल्गार रथयात्रा’ काढणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखविण्यासाठी ही ‘एल्गार रथयात्रा’ असून, दि. २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्या या रथयात्रेचा समारोप होणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात असून, सरकार असंवेदनशिल झाले आहे. पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अतिवृष्टीची भरपाई तत्काळ द्या, रब्बी हंगामात सिंचनासाठी पूर्णवेळ वीज पुरवठा करा, शेतरस्ते, पाणंदरस्त्यांचे प्रश्न तत्काळ निकाली काढा, अशा विविध मागण्या तुपकर यांनी याप्रसंगी केल्या. पत्रपरिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनुप अढाऊ, चंद्रशेखर गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भातील नेते सभागृहात सोयाबीन, कपाशीबाबत बोलणे टाळतात

सध्या सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याकडे पूर्णत: राज्यसरकारचे दुर्लक्ष होत आहे. विदर्भातील नेते सोयाबीन, कपाशीबाबत नेहमी सभागृहात बोलणे टाळतात. त्यामुळेच ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. आगामी दिवसात निवडणुका असून, नेत्यांचे दौरे सुरू होणार आहेत. त्यामुळे शेतकरी पुत्रांनी नेत्यांंच्या गाड्या अडवून सोयाबीन, कपाशीचा जाब विचारावा, असे आवाहन तुपकर यांनी याप्रसंगी केले.

टॅग्स :Akolaअकोला