शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोयाबीनला ९ तर कपाशीला १२,५०० हजार रुपये भाव द्या- रविकांत तुपकर

By रवी दामोदर | Updated: October 27, 2023 18:33 IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढणार ‘एल्गार रथयात्रा’

अकोला: यंदा पावसाचा प्रदीर्घ खंड व यलो मोझॅकमुळे खरीप हंगामात सोयाबीनच्या उताऱ्यात प्रचंड घट झाली आहे. त्यात बाजारात सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थिती सरकारने विना अट प्रति एक्कर १० हजार रुपयांची मदत करावी, तसेच सोयाबीन पिकाला ९ हजार, तर कपाशीला १२,५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहिर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दि.२७ ऑक्टोबर रोजी अकोल्यात आयोजित पत्रपरिषदेतून केली. तसेच कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा संयम सुटला असून, विविध मागण्यांसाठी दि.१ नोव्हेंबर रोजी शेगाव येथून ‘एल्गार रथयात्रा’ काढणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखविण्यासाठी ही ‘एल्गार रथयात्रा’ असून, दि. २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्या या रथयात्रेचा समारोप होणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात असून, सरकार असंवेदनशिल झाले आहे. पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अतिवृष्टीची भरपाई तत्काळ द्या, रब्बी हंगामात सिंचनासाठी पूर्णवेळ वीज पुरवठा करा, शेतरस्ते, पाणंदरस्त्यांचे प्रश्न तत्काळ निकाली काढा, अशा विविध मागण्या तुपकर यांनी याप्रसंगी केल्या. पत्रपरिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनुप अढाऊ, चंद्रशेखर गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भातील नेते सभागृहात सोयाबीन, कपाशीबाबत बोलणे टाळतात

सध्या सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याकडे पूर्णत: राज्यसरकारचे दुर्लक्ष होत आहे. विदर्भातील नेते सोयाबीन, कपाशीबाबत नेहमी सभागृहात बोलणे टाळतात. त्यामुळेच ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. आगामी दिवसात निवडणुका असून, नेत्यांचे दौरे सुरू होणार आहेत. त्यामुळे शेतकरी पुत्रांनी नेत्यांंच्या गाड्या अडवून सोयाबीन, कपाशीचा जाब विचारावा, असे आवाहन तुपकर यांनी याप्रसंगी केले.

टॅग्स :Akolaअकोला