शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दहिहंडा परिसरात पावसाची हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

दहिहंडा : परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर ...

दहिहंडा : परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर गत वीस दिवस पावसाने दडी दिल्याने पिके संकटात सापडली होती. अखेर प्रतीक्षेनंतर मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, पिकांना संजीवनी मिळाली आहे.

अकोला तालुक्यातील दहिहंडा येथील परिसरात वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. परिसरात यंदा खरीप हंगामातील पिकांची स्थिती चांगली असल्यामुळे शेतशिवारात पिके बहरली आहेत. सद्या परिसरात शेती मशागतींच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये निंदण, डवरणी, वखरणी, खतांची मात्रा देणे, फवारणी, आदी कामांना वेग आला आहे. मात्र, गत वीस दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने तापमानात वाढ झाली होती. उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतातील पिकांनी माना खाली टाकणे सुरू केले होते. तसेच काही पिके सुकण्याच्या मार्गावर होते. त्यानंतर गत वीस दिवसांनी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.

--------------------

शेतशिवारात फवारणीला वेग

पावसाने दडी दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने पिके संकटात सापडली आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांवर मावा, तुडतुडा, उंट अळी, बुरशी, आदी रोगांनी अटॅक केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पिके वाचविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, महागड्या कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

170821\img_20210817_150752.jpg

फोटो