शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दहिहंडा परिसरात पावसाची हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

दहिहंडा : परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर ...

दहिहंडा : परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर गत वीस दिवस पावसाने दडी दिल्याने पिके संकटात सापडली होती. अखेर प्रतीक्षेनंतर मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, पिकांना संजीवनी मिळाली आहे.

अकोला तालुक्यातील दहिहंडा येथील परिसरात वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. परिसरात यंदा खरीप हंगामातील पिकांची स्थिती चांगली असल्यामुळे शेतशिवारात पिके बहरली आहेत. सद्या परिसरात शेती मशागतींच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये निंदण, डवरणी, वखरणी, खतांची मात्रा देणे, फवारणी, आदी कामांना वेग आला आहे. मात्र, गत वीस दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने तापमानात वाढ झाली होती. उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतातील पिकांनी माना खाली टाकणे सुरू केले होते. तसेच काही पिके सुकण्याच्या मार्गावर होते. त्यानंतर गत वीस दिवसांनी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.

--------------------

शेतशिवारात फवारणीला वेग

पावसाने दडी दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने पिके संकटात सापडली आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांवर मावा, तुडतुडा, उंट अळी, बुरशी, आदी रोगांनी अटॅक केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पिके वाचविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, महागड्या कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

170821\img_20210817_150752.jpg

फोटो