शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पॉस मशीनद्वारे शंभर टक्के धान्य वाटपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:23 IST

अकोला : धान्याचे वाटप करण्यासाठी शासनाने संगणकीकृत पॉस मशीन दिल्या आहेत. दिवाळीत त्यातून ७५ टक्के वाटप झाले. पुढील महिन्यात १00 टक्के धान्य वाटप पॉस मशीनद्वारेच केले जाईल, त्यातून धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सांगितले. 

ठळक मुद्देद्वारपोच योजनेतून गाठला ७५ टक्के वाटपाचा टप्पालाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धान्याचे वाटप करण्यासाठी शासनाने संगणकीकृत पॉस मशीन दिल्या आहेत. दिवाळीत त्यातून ७५ टक्के वाटप झाले. पुढील महिन्यात १00 टक्के धान्य वाटप पॉस मशीनद्वारेच केले जाईल, त्यातून धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सुधारित धान्य वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची १ ऑक्टोबरपासून द्वारपोच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये गोदाम ते स्वस्त धान्य दुकानापर्यंत थेट धान्याची वाहतूक सुरू आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात पुरवठा अधिकारी कार्यालयाने द्वारपोच योजनेचे नियोजन केले आहे. त्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम होत असल्याने जिल्ह्यात द्वारपोच योजना यशस्वी झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. चालू महिन्यात दिवाळीपूर्वी गहू आणि तांदूळ मिळून ८१,५00 क्विंटल धान्याची उचल भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून करण्यात आली. वाहतूक कंत्राटदारामार्फत अकोला शहर आणि जिल्ह्यातील दुकानांमध्ये दिवाळीपूर्वीच शंभर टक्के पुरवठा करण्यात आला. सर्वांच्या समन्वयाने योजना जिल्ह्यात उत्कृष्टपणे राबवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणारे धान्य पॉस मशीनद्वारेच दिले जाणार आहे. त्यामुळे धान्याचा काळाबाजार करण्याची संधी पॉस मशीनच्या वापरातून मोडीत निघणार आहे. दुकानदार किंवा यंत्रणेतील कोणीही तसा प्रयत्न केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. 

लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य मिळणारद्वारपोच योजनेतून दुकानदारापर्यंत संपूर्ण धान्य पोहचवले जात आहे. त्यामुळे दुकानदारांना लाभार्थ्यांना मंजूर असलेल्या परिमाणाएवढे शंभर टक्के धान्य द्यावेच लागणार आहे. लाभार्थ्यांनी दरमहा आपल्या हक्काच्या धान्याची उचल करावी, दुकानदारांना मागणी करावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी शिंदे यांनी केले आहे.