शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

जलसंधारणासाठी टाळले लग्नाचे मुहूर्त!

By admin | Updated: March 17, 2017 03:07 IST

खैरखेड ग्रामसभेत निर्णय : २२ मेपर्यंत लग्न नाही!

अकोट, दि. १६- सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे खैरखेड विद्रूपा नदीने ग्रासले आहे. तेथील जमीन मुरमाड, पाण्याची पातळी अतिशय खोलवर, पांथस्थाला वाळवंटात तहान लागावी असा भाग आहे. अशा परिस्थितीत ग्रामवासीयांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप - २ ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. ग्रामसभेतून पाच व्यक्तींची नावे प्रशिक्षणासाठी घोषित केली गेली. १६ ते १९ फेब्रुवारी २0१७ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन जलसंधारण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी २२ मे पर्यंत लग्नाचे मुहूर्तही टाळले. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाने प्रशिक्षणार्थी अगदी भारावून गेले. गावाकडे परतल्यानंतर गावामध्ये त्यांनी समरस विचारधारा निर्माण केली व गावामध्ये जल चळवळ सुरू झाली. प्रशिक्षणाने जलसंवर्धनाबरोबरच लोकांचे मन परिवर्तनाचेदेखील काम केले. २ मार्चला झालेल्या ग्रामसभेत लोकांनी ८ एप्रिल ते २२ मे या स्पर्धेच्या कालावधीत गावात कोणीही लग्नाचे मुहूर्त काढणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. वधू-वरांनी बोहल्यावर चढण्याआधी जल-संधारणाला महत्त्व देण्याचे ठरवले. गावाला पाणीदार करण्याचे व्रत समस्त ग्रामवासीयांनी घेतले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक केशवराव मेतकर, सरपंच मारोती हुमने, पाणी फाउंडेशनचे तालुका-समन्वयक नरेंद्र काकड, मनीष महाले, योगेश शिंगोडे, देवेंद्र बन्सोड, शारदा किसन भटकर, रुखमा फुलके, सुनित खंडेराव, अनंत मेतकर, धीरज बोंद्रे, मंगला इंगळे, नीलिमा मेश्राम, विशाल गणवीर, प्रतीक भिवगडे, प्रवीण निकुरने आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.