शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जलसंधारणासाठी टाळले लग्नाचे मुहूर्त!

By admin | Updated: March 17, 2017 03:07 IST

खैरखेड ग्रामसभेत निर्णय : २२ मेपर्यंत लग्न नाही!

अकोट, दि. १६- सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे खैरखेड विद्रूपा नदीने ग्रासले आहे. तेथील जमीन मुरमाड, पाण्याची पातळी अतिशय खोलवर, पांथस्थाला वाळवंटात तहान लागावी असा भाग आहे. अशा परिस्थितीत ग्रामवासीयांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप - २ ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. ग्रामसभेतून पाच व्यक्तींची नावे प्रशिक्षणासाठी घोषित केली गेली. १६ ते १९ फेब्रुवारी २0१७ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन जलसंधारण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी २२ मे पर्यंत लग्नाचे मुहूर्तही टाळले. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाने प्रशिक्षणार्थी अगदी भारावून गेले. गावाकडे परतल्यानंतर गावामध्ये त्यांनी समरस विचारधारा निर्माण केली व गावामध्ये जल चळवळ सुरू झाली. प्रशिक्षणाने जलसंवर्धनाबरोबरच लोकांचे मन परिवर्तनाचेदेखील काम केले. २ मार्चला झालेल्या ग्रामसभेत लोकांनी ८ एप्रिल ते २२ मे या स्पर्धेच्या कालावधीत गावात कोणीही लग्नाचे मुहूर्त काढणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. वधू-वरांनी बोहल्यावर चढण्याआधी जल-संधारणाला महत्त्व देण्याचे ठरवले. गावाला पाणीदार करण्याचे व्रत समस्त ग्रामवासीयांनी घेतले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक केशवराव मेतकर, सरपंच मारोती हुमने, पाणी फाउंडेशनचे तालुका-समन्वयक नरेंद्र काकड, मनीष महाले, योगेश शिंगोडे, देवेंद्र बन्सोड, शारदा किसन भटकर, रुखमा फुलके, सुनित खंडेराव, अनंत मेतकर, धीरज बोंद्रे, मंगला इंगळे, नीलिमा मेश्राम, विशाल गणवीर, प्रतीक भिवगडे, प्रवीण निकुरने आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.