शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जलसंधारणासाठी टाळले लग्नाचे मुहूर्त!

By admin | Updated: March 17, 2017 03:07 IST

खैरखेड ग्रामसभेत निर्णय : २२ मेपर्यंत लग्न नाही!

अकोट, दि. १६- सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे खैरखेड विद्रूपा नदीने ग्रासले आहे. तेथील जमीन मुरमाड, पाण्याची पातळी अतिशय खोलवर, पांथस्थाला वाळवंटात तहान लागावी असा भाग आहे. अशा परिस्थितीत ग्रामवासीयांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप - २ ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. ग्रामसभेतून पाच व्यक्तींची नावे प्रशिक्षणासाठी घोषित केली गेली. १६ ते १९ फेब्रुवारी २0१७ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन जलसंधारण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी २२ मे पर्यंत लग्नाचे मुहूर्तही टाळले. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाने प्रशिक्षणार्थी अगदी भारावून गेले. गावाकडे परतल्यानंतर गावामध्ये त्यांनी समरस विचारधारा निर्माण केली व गावामध्ये जल चळवळ सुरू झाली. प्रशिक्षणाने जलसंवर्धनाबरोबरच लोकांचे मन परिवर्तनाचेदेखील काम केले. २ मार्चला झालेल्या ग्रामसभेत लोकांनी ८ एप्रिल ते २२ मे या स्पर्धेच्या कालावधीत गावात कोणीही लग्नाचे मुहूर्त काढणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. वधू-वरांनी बोहल्यावर चढण्याआधी जल-संधारणाला महत्त्व देण्याचे ठरवले. गावाला पाणीदार करण्याचे व्रत समस्त ग्रामवासीयांनी घेतले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक केशवराव मेतकर, सरपंच मारोती हुमने, पाणी फाउंडेशनचे तालुका-समन्वयक नरेंद्र काकड, मनीष महाले, योगेश शिंगोडे, देवेंद्र बन्सोड, शारदा किसन भटकर, रुखमा फुलके, सुनित खंडेराव, अनंत मेतकर, धीरज बोंद्रे, मंगला इंगळे, नीलिमा मेश्राम, विशाल गणवीर, प्रतीक भिवगडे, प्रवीण निकुरने आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.