शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वर्‍हाडातील मान्सूनपूर्व कापसाचे उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:46 IST

अकोला : पश्‍चिम विदर्भात (वर्‍हाड)काही भागात मान्सूनपूर्व  कापूस पीक घेतले जाते; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे  सुरुवातीला या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. नंतर  हे पीक  फुलोर्‍यावर आले, तेव्हा मात्र सतत जोरदार पाऊस पडल्याने  फुलोरा गळाला; तसेच हवामानात सारखे बदल होत गेल्याने  कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. आता तर पांढरी माशीचा  प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे  कापसाचे  नुकसान झाले असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअचानक पडलेल्या जोरदार पावसाचा परिणाम पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव वाढला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भात (वर्‍हाड)काही भागात मान्सूनपूर्व  कापूस पीक घेतले जाते; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे  सुरुवातीला या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. नंतर  हे पीक  फुलोर्‍यावर आले, तेव्हा मात्र सतत जोरदार पाऊस पडल्याने  फुलोरा गळाला; तसेच हवामानात सारखे बदल होत गेल्याने  कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. आता तर पांढरी माशीचा  प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे  कापसाचे  नुकसान झाले असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.पश्‍चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या  जिल्हय़ात मान्सूनपूर्व कपाशीचे पीक घेतले जाते. त्यासाठीची  तयारी शेतकरी एप्रिल महिन्यातच करीत असतात. मे महिन्यात  या कपाशीची पेरणी केली जाते. पश्‍चिम विदर्भातील उन्हाळा  जगजाहीर आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी विहिरी, तलावा तील पाणी संपते. त्यामुळे शेतकर्‍यांना नैऋत्य मोसमी पावसाची  प्रतीक्षा असते. तथापि, यावर्षी पाऊस एक ते दीड महिना उशिरा  आला. या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नसल्याने सुरुवातीला  िपकांना फटका बसला.दरम्यान, कपाशीवर विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला  असून, पांढरी माशीचा जोर वाढत आहे. त्यामुळे आर्थिक  नुकसानाची पातळी गाठण्यापूर्वी शेतकर्‍यांनी शेताचे नियमित  सर्वेक्षण करावे. त्यासाठी २0 झाडे निवडावीत. प्रत्येक पानावर  प्रती दहा माशा दिसल्यास नुकसान वाढण्याची शक्यता असते.  अशा शेतात शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार  कीडनाशकांची फवारणी करू न व्यवस्थापन करावे, तसेच  अनुजीविकरपा, पानावरील ठिपक्यांचा-रोगाचा काही भागात  प्रादुर्भाव आहे. वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे नियमित क पाशीवर हिरवी, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुड तुड्यांचा प्रभाव कमी झाला असला, तरी काही भागात  थोड्याफार प्रमाणात कपाशीवर तुडतुडे दिसत आहेत. 

सोयाबीनचे पीक फुलले !सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक फुलले  आहे. अनेक ठिकाणी शेंगांचा चांगलाच बहर आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चमुने केलेल्या सर्वेक्षणात  अनेक भागात सोयाबीनच्या एका झाडाला ३0 ते ३५ शेंगा  आल्या आहेत.

वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे मान्सूनपूर्व कापसावर पांढरी  माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर नियमित कपाशीवर हिरवी व  गुलाबी बोंडअळी आली आहे. शेतकर्‍यांनी दररोज शेताचे  सर्वेक्षण करू न किडींचे व्यवस्थापन करावे.- डॉ. अनिल कोल्हे,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.