शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

मान्सूनपूर्व नाले सफाईचा फज्जा; जून महिन्यांत केवळ ३६ नाल्यांची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

आशिष गावंडे अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनात निर्माण झालेला बेबनाव सर्वसामान्य अकाेलेकरांच्या मुळावर उठल्याचे ...

आशिष गावंडे

अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनात निर्माण झालेला बेबनाव सर्वसामान्य अकाेलेकरांच्या मुळावर उठल्याचे समाेर आले आहे. प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी नाले सफाईसाठी ७५ लाखांची तरतूद केली. झाेननिहाय कंत्राट न देता एकाच कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यावर भाजपनेही निधी मंजुरीला खाेडा घातला. त्यामुळे जून महिन्यांत कंत्राटदाराने केवळ ३६ नाल्यांची सफाई केली. त्याचे परिणाम २१ जुलैच्या रात्री अकाेलेकरांना भाेगावे लागले.

मागील काही दिवसांपासून महापालिकेत सत्ताधारी व प्रशासनात विविध मुद्यांवर बिनसल्याचे चित्र आहे. गतवर्षी काेराेनाच्या साथीमुळे मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे हाेऊ शकली नव्हती. परिणामी शहरातील सर्वच नाले घाणीने तुडुंब साचले. साहजिकच, यंदा नाल्यांची व्यवस्थित साफसफाई हाेणे अपेक्षित हाेते. बांधकाम विभागाने संपूर्ण शहरातील नाले सफाईसाठी एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करणे याेग्य राहील, असे मत व्यक्त केल्याने प्रभारी आयुक्तांनी निविदा प्रसिद्ध केली. बांधकाम विभागाच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील विकास कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याने मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट मिळवून दिले. हा प्रयाेग प्रशासनाच्या अंगलट आला. प्रशासनाने नाले सफाईसाठी १५ व्या वित्त आयाेगातून ७५ लाखांची तरतूद करण्याच्या शिफारशीला स्थायी समितीने बाजूला सारले. प्रशासनाने समन्वयातून ताेडगा काढणे अपेक्षित हाेते. तसे न करता नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ३६ नाल्यांची सफाई करण्यात आली. त्याचे परिणाम २१ जुलै राेजी रात्री आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांना भाेगावे लागले.

नाले सफाईचे केवळ १० टक्के काम

मनपाची हद्दवाढ झाल्याने शहरात सुमारे ३००च्या आसपास लहान-माेठे नाले आहेत. २०१९ मध्ये मनपाने नाले सफाईसाठी ४४ लाखांची तरतूद केली हाेती. यंदा प्रशासनाने ७५ लाखांची तरतूद केली. परंतु प्रत्यक्षात ३६ नाल्यांची साफसफाई हाेऊ शकली. हे प्रमाण केवळ १० टक्के आहे.

नागरिक संकटात; जबाबदार काेण?

मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम व दक्षिण झाेनमधील नागरिकांना बसला. प्रशासनासह सत्तापक्षाने नाले सफाईकडे कानाडाेळा केल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरले. या संकटाला जबाबदार काेण, त्यावर कारवाई हाेईल का,असा सवाल उपस्थित झाला आहे.