शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मान्सूनपूर्व नाले सफाईचा फज्जा; जून महिन्यांत केवळ ३६ नाल्यांची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

आशिष गावंडे अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनात निर्माण झालेला बेबनाव सर्वसामान्य अकाेलेकरांच्या मुळावर उठल्याचे ...

आशिष गावंडे

अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनात निर्माण झालेला बेबनाव सर्वसामान्य अकाेलेकरांच्या मुळावर उठल्याचे समाेर आले आहे. प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी नाले सफाईसाठी ७५ लाखांची तरतूद केली. झाेननिहाय कंत्राट न देता एकाच कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यावर भाजपनेही निधी मंजुरीला खाेडा घातला. त्यामुळे जून महिन्यांत कंत्राटदाराने केवळ ३६ नाल्यांची सफाई केली. त्याचे परिणाम २१ जुलैच्या रात्री अकाेलेकरांना भाेगावे लागले.

मागील काही दिवसांपासून महापालिकेत सत्ताधारी व प्रशासनात विविध मुद्यांवर बिनसल्याचे चित्र आहे. गतवर्षी काेराेनाच्या साथीमुळे मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे हाेऊ शकली नव्हती. परिणामी शहरातील सर्वच नाले घाणीने तुडुंब साचले. साहजिकच, यंदा नाल्यांची व्यवस्थित साफसफाई हाेणे अपेक्षित हाेते. बांधकाम विभागाने संपूर्ण शहरातील नाले सफाईसाठी एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करणे याेग्य राहील, असे मत व्यक्त केल्याने प्रभारी आयुक्तांनी निविदा प्रसिद्ध केली. बांधकाम विभागाच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील विकास कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याने मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट मिळवून दिले. हा प्रयाेग प्रशासनाच्या अंगलट आला. प्रशासनाने नाले सफाईसाठी १५ व्या वित्त आयाेगातून ७५ लाखांची तरतूद करण्याच्या शिफारशीला स्थायी समितीने बाजूला सारले. प्रशासनाने समन्वयातून ताेडगा काढणे अपेक्षित हाेते. तसे न करता नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ३६ नाल्यांची सफाई करण्यात आली. त्याचे परिणाम २१ जुलै राेजी रात्री आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांना भाेगावे लागले.

नाले सफाईचे केवळ १० टक्के काम

मनपाची हद्दवाढ झाल्याने शहरात सुमारे ३००च्या आसपास लहान-माेठे नाले आहेत. २०१९ मध्ये मनपाने नाले सफाईसाठी ४४ लाखांची तरतूद केली हाेती. यंदा प्रशासनाने ७५ लाखांची तरतूद केली. परंतु प्रत्यक्षात ३६ नाल्यांची साफसफाई हाेऊ शकली. हे प्रमाण केवळ १० टक्के आहे.

नागरिक संकटात; जबाबदार काेण?

मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम व दक्षिण झाेनमधील नागरिकांना बसला. प्रशासनासह सत्तापक्षाने नाले सफाईकडे कानाडाेळा केल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरले. या संकटाला जबाबदार काेण, त्यावर कारवाई हाेईल का,असा सवाल उपस्थित झाला आहे.