शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

मान्सूनपूर्व नाले सफाईचा फज्जा; जून महिन्यांत केवळ ३६ नाल्यांची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

आशिष गावंडे अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनात निर्माण झालेला बेबनाव सर्वसामान्य अकाेलेकरांच्या मुळावर उठल्याचे ...

आशिष गावंडे

अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनात निर्माण झालेला बेबनाव सर्वसामान्य अकाेलेकरांच्या मुळावर उठल्याचे समाेर आले आहे. प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी नाले सफाईसाठी ७५ लाखांची तरतूद केली. झाेननिहाय कंत्राट न देता एकाच कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यावर भाजपनेही निधी मंजुरीला खाेडा घातला. त्यामुळे जून महिन्यांत कंत्राटदाराने केवळ ३६ नाल्यांची सफाई केली. त्याचे परिणाम २१ जुलैच्या रात्री अकाेलेकरांना भाेगावे लागले.

मागील काही दिवसांपासून महापालिकेत सत्ताधारी व प्रशासनात विविध मुद्यांवर बिनसल्याचे चित्र आहे. गतवर्षी काेराेनाच्या साथीमुळे मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे हाेऊ शकली नव्हती. परिणामी शहरातील सर्वच नाले घाणीने तुडुंब साचले. साहजिकच, यंदा नाल्यांची व्यवस्थित साफसफाई हाेणे अपेक्षित हाेते. बांधकाम विभागाने संपूर्ण शहरातील नाले सफाईसाठी एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करणे याेग्य राहील, असे मत व्यक्त केल्याने प्रभारी आयुक्तांनी निविदा प्रसिद्ध केली. बांधकाम विभागाच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील विकास कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याने मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट मिळवून दिले. हा प्रयाेग प्रशासनाच्या अंगलट आला. प्रशासनाने नाले सफाईसाठी १५ व्या वित्त आयाेगातून ७५ लाखांची तरतूद करण्याच्या शिफारशीला स्थायी समितीने बाजूला सारले. प्रशासनाने समन्वयातून ताेडगा काढणे अपेक्षित हाेते. तसे न करता नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ३६ नाल्यांची सफाई करण्यात आली. त्याचे परिणाम २१ जुलै राेजी रात्री आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांना भाेगावे लागले.

नाले सफाईचे केवळ १० टक्के काम

मनपाची हद्दवाढ झाल्याने शहरात सुमारे ३००च्या आसपास लहान-माेठे नाले आहेत. २०१९ मध्ये मनपाने नाले सफाईसाठी ४४ लाखांची तरतूद केली हाेती. यंदा प्रशासनाने ७५ लाखांची तरतूद केली. परंतु प्रत्यक्षात ३६ नाल्यांची साफसफाई हाेऊ शकली. हे प्रमाण केवळ १० टक्के आहे.

नागरिक संकटात; जबाबदार काेण?

मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम व दक्षिण झाेनमधील नागरिकांना बसला. प्रशासनासह सत्तापक्षाने नाले सफाईकडे कानाडाेळा केल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरले. या संकटाला जबाबदार काेण, त्यावर कारवाई हाेईल का,असा सवाल उपस्थित झाला आहे.