शहरातील सर्व प्रमुख रस्ते, चाैकांमध्ये फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेत वाहने ठेवण्यासाठी पार्किंग उपलब्ध नाही, नागरिकांना रस्त्यालगत वाहने उभी करावी लागत असल्याने वाहतूक काेंडी हाेत आहे. या समस्यांचे मनपा प्रशासनाने निराकरण करणे अपेक्षित असताना खुद्द प्रशासनाकडून चक्क रस्त्यावर पार्किंग उभारण्याला संमती दिल्याचे समाेर आले आहे. यामध्ये शहरात सर्वाधिक गजबजलेल्या गांधी चाैकातील कवच आर्केड संकुलाच्या मागील रस्त्याचा समावेश आहे.
विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी शहरात वाहनतळ उपलब्ध नाहीत. रस्त्यालगत जागा दिसेल त्याठिकाणी वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक काेंडीची समस्या निर्माण झाली आहे. अर्थात, या समस्येवर प्रभावी ताेडगा काढण्याची गरज असताना थातूरमातूर उपाययाेजना केल्या जात असल्याचे समाेर आले आहे. मनपाच्या मालकीच्या १३ ठिकाणी वाहनतळ उभारण्यासाठी बाजार विभागाने निविदा प्रसिद्ध केली हाेती. यापैकी केवळ तीन निविदा प्राप्त झाल्या असून, त्यातही रस्त्याच्या मधाेमध वाहनतळ उभारण्याच्या निविदेचा समावेश आहे. कहर म्हणजे ही निविदा प्रभारी आयुक्त अराेरा यांनी मंजूर केली असून, प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१३ पैकी केवळ तीन जागेची निविदा
मनपा प्रशासनाने शहरात १३ ठिकाणी पार्किंगची सुविधा देण्याच्या उद्देशातून निविदा प्रसिद्ध केली हाेती. यापैकी केवळ तीन जागेसाठी निविदा प्राप्त झाली. यामध्ये मनपाची आवारभिंत, नवीन कापड मार्केटलगतचे श्रीराम गॅरेजचा परिसर तसेच गांधी चाैकातील कवच आर्केड संकुलामागील मुख्य रस्त्याचा समावेश आहे.
..तर जबाबदार काेण?
कवच आर्केड संकुलामागे अनेक खासगी हाॅस्पिटल, औषधी दुकाने, खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने असल्यामुळे याठिकाणी बाराही महिने अकाेलेकरांची गर्दी दिसते. या परिसरात काही दुर्घटना घडल्यास नागरिकांना बाहेर निघणे मुश्कील हाेणार आहे. त्यावेळी हाेणाऱ्या हानीची जबाबदारी काेणाची, असा सवाल उपस्थित हाेत आहे.