शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

भाजपमधील मतभेद झाकण्यासाठी आघाडीच्या एकीवर स्तुतिसुमने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST

महाविकास आघाडीचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे महापौर संदीप जोशी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. असा एकतर्फी ...

महाविकास आघाडीचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे महापौर संदीप जोशी यांचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. असा एकतर्फी निकाल भाजपला तर सोडा; पण काँग्रेसलाही अपेक्षित नव्हता. हे यश मिळविण्यासाठी वंजारी यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच नाकारता येणार नाही. मात्र, पक्षांतर्गत धुसफुसीवर पांघरूण घालण्यासाठी या विजयाला बहुजनवादाचा सदरा चढविण्याचेही काम जोरात सुरू आहे. मात्र, यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आ. अनिल सोले हे भाजपकडून लढले तेव्हा यांच्या विरोधात हा बहुजनवाद का चालला नाही, यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. संदीप जोशी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेले खा. रामदास तडस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खा. सुनील मेंढे, आ. परिणय फुके, आ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे आदी नेते बहुजन समाजातीलच आहेत. जनतेची नाडी ओळखणाऱ्या नेत्यांना हवेचा अंदाज कसा आला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

घातपात झाल्याची भावना

- भाजपची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे नेटवर्क व दिग्गज नेत्यांची फौज पाहता पदवीधरमध्ये पराभव होणे शक्य नाही. मात्र, त्यानंतरही चक्कर आणणारा निकाल आला. जवळच्यांनीच घातपात केला. अपेक्षित साथ मिळाली नाही, अशी भावना जोशी समर्थकांमध्ये आहे. पक्षशिस्तीचा भंग नको म्हणून ते उघडपणे बोलणे टाळत आहेत.

गडकरी समर्थकांचाच पत्ता कट का?

- गेल्या विधानसभा निवडणुकीपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थकांचाच पत्ता का कट केला जात आहे, यावरही आता भाजपमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. लोकमतशी बोलताना भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) यांचे तिकीट ऐनवेळी का कापण्यात आले, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. भंडारा जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार होते. या तीनही आमदारांचे तिकीट कुणाच्या लॉबिंगमुळे व कुणाला खूश करण्यासाठी कापण्यात आले, यावर निकालानंतरही चिंतन झाले नाही. एवढ्यावरच हे सर्व थांबले नाही. आता पदवीधरमध्ये गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनिल सोले यांचे तिकीट कापले. हे करताना गडकरींना खरोखर विश्वासात घेतले गेले का, असा प्रश्न या नेत्याने उपस्थित केला. एकूणच आजवरच्या घडामोडींमुळे नाराज असलेले गडकरी समर्थक आता पदवीधरच्या निकालाचे निमित्त साधून भावना मोकळ्या करू लागले आहेत.