शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST

प्रभावतीबाई नागोराव महल्ले अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर ...

प्रभावतीबाई नागोराव महल्ले

अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे. प्रतिष्ठित नागरिक संतोष नागोराव महल्ले यांच्या त्या आई होत. (फोटो)

--------------------------------------------------------

अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित

बाळापूर: घरकूल लाभार्थी यादी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मंजूर असून, अतिक्रमण जागेबाबत प्रश्न मार्गी न लागल्याने पात्र असतानाही अनेक लाभार्थी घरकूल लाभापासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन घरकूल लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------------------

‘वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करा!’

अकोट: उन्हाळा सुरू होताच वनातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत व शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्याचे आवाहन येथील पक्षीप्रेमी रितेश जॉन यांनी केले आहे.

------------------------------------------

जडवाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

निंबा फाटा: निंबा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जडवाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

---------------------------------------

व्हायरल फीव्हरमुळे नागरिक हैराण

पांढुर्णा: मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फीव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

----------------------------------------------------------------------

ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतित

पातूर: तालुक्यात यंदा मुबलक पाण्याची सुविधा असल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. बाजार बंद असल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.