शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST

प्रभावतीबाई नागोराव महल्ले अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर ...

प्रभावतीबाई नागोराव महल्ले

अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे. प्रतिष्ठित नागरिक संतोष नागोराव महल्ले यांच्या त्या आई होत. (फोटो)

--------------------------------------------------------

अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित

बाळापूर: घरकूल लाभार्थी यादी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मंजूर असून, अतिक्रमण जागेबाबत प्रश्न मार्गी न लागल्याने पात्र असतानाही अनेक लाभार्थी घरकूल लाभापासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन घरकूल लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------------------

‘वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करा!’

अकोट: उन्हाळा सुरू होताच वनातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत व शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्याचे आवाहन येथील पक्षीप्रेमी रितेश जॉन यांनी केले आहे.

------------------------------------------

जडवाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

निंबा फाटा: निंबा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जडवाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

---------------------------------------

व्हायरल फीव्हरमुळे नागरिक हैराण

पांढुर्णा: मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फीव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

----------------------------------------------------------------------

ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतित

पातूर: तालुक्यात यंदा मुबलक पाण्याची सुविधा असल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. बाजार बंद असल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.