शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST

प्रभावतीबाई नागोराव महल्ले अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर ...

प्रभावतीबाई नागोराव महल्ले

अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे. प्रतिष्ठित नागरिक संतोष नागोराव महल्ले यांच्या त्या आई होत. (फोटो)

--------------------------------------------------------

अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित

बाळापूर: घरकूल लाभार्थी यादी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मंजूर असून, अतिक्रमण जागेबाबत प्रश्न मार्गी न लागल्याने पात्र असतानाही अनेक लाभार्थी घरकूल लाभापासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन घरकूल लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------------------

‘वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करा!’

अकोट: उन्हाळा सुरू होताच वनातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत व शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्याचे आवाहन येथील पक्षीप्रेमी रितेश जॉन यांनी केले आहे.

------------------------------------------

जडवाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

निंबा फाटा: निंबा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जडवाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

---------------------------------------

व्हायरल फीव्हरमुळे नागरिक हैराण

पांढुर्णा: मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फीव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

----------------------------------------------------------------------

ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतित

पातूर: तालुक्यात यंदा मुबलक पाण्याची सुविधा असल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. बाजार बंद असल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.