शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अखेर वीजपुरवठा खंडित ; ६४ खेड्यांत जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST

अकोला : जिल्ह्यातील खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी अखेरपर्यंत १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीज ...

अकोला : जिल्ह्यातील खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी अखेरपर्यंत १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीज देयक थकीत असल्याने, अखेर वीज वितरण कंपनीमार्फत या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा मंगळवारी खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने योजनेंतर्गत खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि खारपाणपट्ट्यातील अकाेला तालुक्यातल्या खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे फेब्रुवारी अखेरपर्यंत २ कोटी १९ लाख रुपयांचे वीज देयक थकीत आहे. थकीत वीज देयकाच्या रकमेचा भरणा न केल्यास दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गत ९ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने वीज देयकाचा थकबाकीचा भरणा केला नसल्याने, १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीज देयक थकीत असलेल्या खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई १६ मार्च रोजी सायंकाळी वीज वितरण कंपनीमार्फत करण्यात आली. वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

८४ खेडी, ६४ खेडी योजनेची

४२ कोटींची पाणीपट्टी थकीत

जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजनांची फेब्रुवारी अखेरपर्यंत ४२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. त्यामध्ये ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ३५ कोटी २८ लाख पाणीपट्टी थकीत असून, केवळ ८ लाख १२ हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ७ कोटी ८४ लाख रुपये पाणीपट्टी थकीत असून त्यापैकी केवळ ५५ लाख ६ हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. पाणीपट्टी वसुलीचे अत्यल्प प्रमाण असल्याने वीज देयकांची रक्कम अदा करण्याचा प्रश्न जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे.

वीज देयकाची रक्कम थकीत असल्याने खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीमार्फत १६ मार्च रोजी सायंकाळी खंडित करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

अनिस खान

प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.