शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST

संतोषकुमार गवई पातूर : वीज बिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागात नागरिक धास्तावले ...

संतोषकुमार गवई

पातूर : वीज बिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागात नागरिक धास्तावले आहेत. तसेच कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. महावितरणच्या या धडक मोहिमेविरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र आहे.

महावितरणकडून थकीत वीज बिलांची वसूली करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत महावितरणकडून वीज बिल थकीत असणाऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्या जात होते. या कारवाईला विरोध झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती; मात्र ही स्थगिती उठविल्यानंतर महावितरणकडून पुन्हा धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी पाणी देता येत नसल्याने तालुक्यातील ८०० ते ९०० एकरावरील पिके धोक्यात सापडली आहेत. दि. १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून वीज बिलांची वसुली करण्याचे निर्देश दिले. यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकल्याने तालुक्यात महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे. सध्या पिके शेतात बहरली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने विजेअभावी पाणी देणे शक्य नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. महावितरणच्या या कारवाईच्या विरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे.

-----------------------------

नागरिकांमध्ये धास्ती

थकीत वीज बिलांची वसुली महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत महावितरणकडून वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या महामारीत शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच वीज बिलाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न मजुरांना पडला आहे.

-------------------------------

तालुक्यात उन्हाळी पिकांची पेरणी वाढली!

गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांची पेरणी वाढली आहे. पातूर तालुक्यात ७३३ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी भूईमुगाला पसंती दिल्याने तालुक्यात ४७३ हेक्टरवर भूईमुगाची पेरणी झाली आहे.