शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST

संतोषकुमार गवई पातूर : वीज बिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागात नागरिक धास्तावले ...

संतोषकुमार गवई

पातूर : वीज बिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागात नागरिक धास्तावले आहेत. तसेच कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. महावितरणच्या या धडक मोहिमेविरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र आहे.

महावितरणकडून थकीत वीज बिलांची वसूली करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत महावितरणकडून वीज बिल थकीत असणाऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्या जात होते. या कारवाईला विरोध झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती; मात्र ही स्थगिती उठविल्यानंतर महावितरणकडून पुन्हा धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी पाणी देता येत नसल्याने तालुक्यातील ८०० ते ९०० एकरावरील पिके धोक्यात सापडली आहेत. दि. १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून वीज बिलांची वसुली करण्याचे निर्देश दिले. यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकल्याने तालुक्यात महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे. सध्या पिके शेतात बहरली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने विजेअभावी पाणी देणे शक्य नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. महावितरणच्या या कारवाईच्या विरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे.

-----------------------------

नागरिकांमध्ये धास्ती

थकीत वीज बिलांची वसुली महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत महावितरणकडून वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या महामारीत शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच वीज बिलाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न मजुरांना पडला आहे.

-------------------------------

तालुक्यात उन्हाळी पिकांची पेरणी वाढली!

गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांची पेरणी वाढली आहे. पातूर तालुक्यात ७३३ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी भूईमुगाला पसंती दिल्याने तालुक्यात ४७३ हेक्टरवर भूईमुगाची पेरणी झाली आहे.