शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित; शेतकरी हतबल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST

खेट्री : वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे नागरिक धास्तावले आहेत. ...

खेट्री : वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे नागरिक धास्तावले आहेत. एकीकडे, शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. दुसरीकडे, लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

वीज बिल थकीत असलेल्या कृषिपंप व घरगुती कनेक्शनधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत राज्य सरकारच्या सक्तीच्या आदेशावरून महावितरण विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सस्ती वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतशिवारात लाखोंची वीजचोरी होत आहे. शासनाच्या आदेशावरून आतापर्यंत सस्ती वीज वितरण विभागाकडून ३५ ते ४० कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ अभियंता पी. ए. गुहे यांनी दिली आहे.

लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांना अभय !

वीज बिल थकीत असलेल्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे; मात्र परिसरात लाखोंची वीजचोरी केल्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते, तर लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांना अभय का, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

शासनाच्या आदेशानुसार वीज बिल थकीत असलेल्या वीजजोडणीधारकांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याची कारवाई सुरू आहे. तसेच वीजचोरी करणाऱ्यांवरसुद्धा कृषी पंप, सर्व्हिस लाइन जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात येईल.

- पी. ए. गुहे, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, सस्ती