शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतीक्षेत्रात सकारात्मक बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST

अकोट : जुन्या कायद्यांमुळे शेतीक्षेत्र अडचणीत आले होते. त्याचा विपरीत परिणाम शेतीक्षेत्रावर झाला. त्याची परिणती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झाली. तेव्हा ...

अकोट : जुन्या कायद्यांमुळे शेतीक्षेत्र अडचणीत आले होते. त्याचा विपरीत परिणाम शेतीक्षेत्रावर झाला. त्याची परिणती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झाली. तेव्हा हे कायदे बदलणे अपरिहार्य होते. कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आले. औद्योगिक मालाचा ग्राहक मंदावला. याचा परिणाम उद्योग जगतावर व देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर झाला. यामुळे देशात ५५ टक्के शेतीक्षेत्र असलेल्या लोकांच्या खिशात पैसा आला तरच देशात ग्राहक निर्माण होतील. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने जुन्या कायद्यात बदल करून नवीन कायद्याची निर्मिती केली. या कायद्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर सारून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ललित पाटील बहाळे यांनी केले.

शेतकरी संघटनेचे नेते ललित पाटील बहाळे यांची संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शनिवारी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर होते. कार्यक्रमाला माधवराव गावंडे, सतीशबाबा देशमुख, गजानन पाटील दुधाट, विठ्ठलराव गुजरकर, अजाबराव मोकळकर यांची समायोचित भाषणे झाली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती बाजार समितीच्या सभापती भारती गावंडे, प्रमिला भारसाकळे, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब फोकमारे, विलासराव ताथोड, नीलेश पाटील, दादाभाऊ टोहोरे जियाउद्दीन मेंबर, मधु कोल्हे, इमायत हुसेन, दिनेश देऊळकार, संजय ढोकणे, अनंतराव तळोकार, गोपाल भाकरे, गजानन खोटरे, दिलीप गावंडे, सुरेश सोनोने, महेश उमाळे, मंगेश रेळे, आकाश देऊळकार, अजित कळसकर, गजानन मोहोकार, मोहन खिरोडकार, मकसूद मुल्लाजी, दिनेश गिऱ्हे, संतोष तायडे, प्रवीण गैधर, जाफर खा, गोपाळ निमकर्डे उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कमल सारभुकन व मानवेंद्र काचोळे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. प्रास्ताविक लक्ष्मीकांत कौठकर यांनी केले. सूत्रसंचालन संदीप मंगळे यांनी केले. आभार नीलेश नेमाडे यांनी मानले.

फोटो :