शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वाडेगाव येथे अनेक वर्षांपासून शेतरस्त्यांची दयनीय अवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

वाडेगाव: येथील शेतशिवारातील शेतरस्ते अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना ...

वाडेगाव: येथील शेतशिवारातील शेतरस्ते अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरेे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना चिखलमय रस्त्यातून वाट धरावी लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

येथील बाळापूर मार्गावरील नारायण महाराज संस्थान ते सिंगर नाल्यापर्यंत अंदाजे ४ किलोमीटर अंतर असलेल्या शेतरस्त्याच्या दुरुस्ती बाबतीत तत्कालीन पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात संबंधित शेतकऱ्यांकडून निवेदन सादर करण्यात आले होते. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात मंजुरीही मिळाली. रस्त्याची पाहणी करून इस्टिमेट वर्क ऑर्डर करून आदेश निघाल्याची माहिती आहे; परंतु शासनस्तरावरील बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (फोटो)

शेतकऱ्यांसह वाहनचालकांना करावी लागते तारेवरची कसरत

शेतरस्त्यावर दगड व खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना शेतकऱ्यांसह वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल घरापर्यंत घेऊन येणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------

शेतरस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाकडून लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- प्रकाश पाटीलखेडे, शेतकरी वाडेगाव.