शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगाव येथे अनेक वर्षांपासून शेतरस्त्यांची दयनीय अवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

वाडेगाव: येथील शेतशिवारातील शेतरस्ते अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना ...

वाडेगाव: येथील शेतशिवारातील शेतरस्ते अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरेे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना चिखलमय रस्त्यातून वाट धरावी लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

येथील बाळापूर मार्गावरील नारायण महाराज संस्थान ते सिंगर नाल्यापर्यंत अंदाजे ४ किलोमीटर अंतर असलेल्या शेतरस्त्याच्या दुरुस्ती बाबतीत तत्कालीन पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात संबंधित शेतकऱ्यांकडून निवेदन सादर करण्यात आले होते. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात मंजुरीही मिळाली. रस्त्याची पाहणी करून इस्टिमेट वर्क ऑर्डर करून आदेश निघाल्याची माहिती आहे; परंतु शासनस्तरावरील बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (फोटो)

शेतकऱ्यांसह वाहनचालकांना करावी लागते तारेवरची कसरत

शेतरस्त्यावर दगड व खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना शेतकऱ्यांसह वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल घरापर्यंत घेऊन येणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------

शेतरस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाकडून लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- प्रकाश पाटीलखेडे, शेतकरी वाडेगाव.