शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा; जलशुद्धीकरण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:54 IST

अकोला: मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकोला: मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपाच्या जलप्रदाय विभागाने महान धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असून, तो अशुद्ध नसल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून होत आहे. धरणात पुरेसा जलसाठा असताना महापालिकेने पाचवा व्हॉल्व्ह नेमक ा कशासाठी उघडला आणि याच वर्षी पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा कसा, असे नानाविध प्रश्न उपस्थित होऊन महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावरील प्रक्रियेबद्दल शंका निर्माण केली जात आहे.आज रोजी महान धरणात २२.१ इतका जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणातील जलसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा परिणाम उपलब्ध जलसाठ्यावर होईल, हे निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून अकोलेकरांना पाणी पुरवठा करताना मनपाच्या जलप्रदाय विभागाला कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत शहरवासीयांना दर दोन तसेच काही भागातील नागरिकांना तीन दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. सध्याचे चित्र पाहता नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत असला, तरी मागील काही दिवसांपासून शहरवासीयांना पिवळसर रंगाचा गढूळ पाणी पुरवठा होत आहे. या पाण्याचा नाइलाजाने पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पदाधिकारी व्यस्त; अकोलेकर त्रस्तमागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात नागरिक सातत्याने ओरड करीत असले तरी त्यांचा आवाज ऐकून घेणारे महापालिकेतील पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तूर्तास तरी अकोलेकरांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.

पाचवा व्हॉल्व्ह याच वर्षी उघडला का?धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याचे मनपाकडून स्पष्ट केल्या जात आहे. आजवरचा अनुभव लक्षात घेता धरणातील जलसाठ्याने तळ गाठल्यानंतर पाचवा व्हॉल्व्ह उघडला जातो. अद्याप तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. असो, पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यानंतरही अकोलेकरांना इतक्या दिवसपर्यंत गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने मनपा प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.आयुक्त साहेब समस्या मार्गी लावा!गढूळ पाणी पुरवठ्यामुळे अकोलेकरांमध्ये घबराट पसरली आहे. पिवळ्या रंगाचे पाणी अशुद्ध नसल्याचा दावा करणाºया प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या प्रकाराची दखल महापालिका आयुक्त संजय कापडणीस घेतील क ा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका