शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा; जलशुद्धीकरण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:54 IST

अकोला: मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकोला: मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपाच्या जलप्रदाय विभागाने महान धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असून, तो अशुद्ध नसल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून होत आहे. धरणात पुरेसा जलसाठा असताना महापालिकेने पाचवा व्हॉल्व्ह नेमक ा कशासाठी उघडला आणि याच वर्षी पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा कसा, असे नानाविध प्रश्न उपस्थित होऊन महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावरील प्रक्रियेबद्दल शंका निर्माण केली जात आहे.आज रोजी महान धरणात २२.१ इतका जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणातील जलसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा परिणाम उपलब्ध जलसाठ्यावर होईल, हे निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून अकोलेकरांना पाणी पुरवठा करताना मनपाच्या जलप्रदाय विभागाला कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत शहरवासीयांना दर दोन तसेच काही भागातील नागरिकांना तीन दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. सध्याचे चित्र पाहता नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत असला, तरी मागील काही दिवसांपासून शहरवासीयांना पिवळसर रंगाचा गढूळ पाणी पुरवठा होत आहे. या पाण्याचा नाइलाजाने पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पदाधिकारी व्यस्त; अकोलेकर त्रस्तमागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात नागरिक सातत्याने ओरड करीत असले तरी त्यांचा आवाज ऐकून घेणारे महापालिकेतील पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तूर्तास तरी अकोलेकरांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.

पाचवा व्हॉल्व्ह याच वर्षी उघडला का?धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याचे मनपाकडून स्पष्ट केल्या जात आहे. आजवरचा अनुभव लक्षात घेता धरणातील जलसाठ्याने तळ गाठल्यानंतर पाचवा व्हॉल्व्ह उघडला जातो. अद्याप तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. असो, पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यानंतरही अकोलेकरांना इतक्या दिवसपर्यंत गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने मनपा प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.आयुक्त साहेब समस्या मार्गी लावा!गढूळ पाणी पुरवठ्यामुळे अकोलेकरांमध्ये घबराट पसरली आहे. पिवळ्या रंगाचे पाणी अशुद्ध नसल्याचा दावा करणाºया प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या प्रकाराची दखल महापालिका आयुक्त संजय कापडणीस घेतील क ा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका