शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

प्रदूषणकारी मलबा प्रक्रियेविनाच जातो जमिनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:25 IST

२७ पैकी १६ महापालिकांनी याप्रकरणी कारवाई करणारी यंत्रणाच उभारली नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला.

- सदानंद सिरसाटअकोला : नवीन इमारतींचे बांधकाम तसेच जीर्ण इमारती पाडताना त्या मलब्यातून वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची जबाबदारी असताना राज्यातील २७ पैकी १६ महापालिकांनी याप्रकरणी कारवाई करणारी यंत्रणाच उभारली नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला. तसेच महापालिकांना नोटीस देत जबाबदारी निश्चित करण्याचेही सातत्याने बजावले आहे.विशेष म्हणजे, नवीन बांधकाम करताना प्रदूषण होऊ नये तसेच जीर्ण इमारतीच्या मलबा थेट जमिनीत न गाडता त्यावर प्रक्रिया केल्यानंतरच विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डिमोलिशन वेस्ट मॅनेजमेंट रुल्स-२०१६’ लागू केला आहे. या अधिनियमानुसार अंमलबजावणीचा वार्षिक अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला. तसेच अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील एकूण ३८४ संख्येत असलेल्या महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींना सातत्याने नोटीसही दिल्या आहेत. तरीही राज्यातील २७ पैकी १६ महापालिकांनी कायदेशीर प्रक्रिया राबविण्यासाठी यंत्रणाच उभारली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकांनी ही यंत्रणा उभारल्यास प्रदूषण निर्माण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाते. तसेच हवा आणि जमिनीचे प्रदूषण होण्याला पायबंद घालता येतो; मात्र त्याबाबत महापालिका कमालीच्या उदासीन असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. 

- प्रदूषण रोखण्यास उदासीन महापालिकाबांधकाम व मलब्याने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी म्युनिसिपल मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करण्याला १६ महापालिकांनी ‘खो’ दिला आहे. त्यामध्ये बृहन्मुंबई, पिंप्री चिंचवड, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, पनवेल, कोल्हापूर, नांदेड वाघाळा, धुळे, चंद्रपूर, अकोला, अमरावती, लातूर, वसई-विरार व अहमदनगर या महापालिकांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण