शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गावागावांत तापू लागले राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:49 IST

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर गावपातळीवर पुढार्‍यांकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण तापू लागले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर गावपातळीवर पुढार्‍यांकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण तापू लागले आहे.पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने निवडणुका होत असलेल्या गावांमध्ये इच्छुक उमेदवारांसह गाव पातळीवरील पुढार्‍यांकडून निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानुषंगाने ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पॅनल गठित करणे, पॅनलचे जास्तीत -जास्तीत उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या कामात गाव पातळीवरील पुढारी गुंतले आहेत. त्यामध्ये पॅनलची उमेदवारी मिळवून वॉर्डात विजय कसा मिळविता येईल, या दृष्टीने इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्यास केवळ सहा दिवसांचा कालावधी उरला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण गावागावांत तापू लागले आहे. या निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची मोर्चेबांधणी संबंधित पॅनल-गटांच्या पुढार्‍यांकडून केली जात आहे.

सरपंचांची थेट जनतेतून निवड; इच्छुकांचे बाशिंग गुडघ्याला!ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी  थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने सरपंच पदांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गावागावांतील अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्याने, गावातील मतदारांसमोर जाऊन, ही निवडणूक लढविण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी सुरू केली आहे.